शेतकऱ्यांच्या हितासाठी विधानसभा निवडणूक लढवणारच, डॉ. निळकंठ पाटलांचा निर्धार

पाचोरा : तालुक्यातील नांद्रा येथील श्रीराम आश्रमात शेतकऱ्यांसाठी मंगळवार, २४ रोजी “जगाचा पोशिंदा बळीराजा” हा मेळावा पार पडला. या मेळाव्यात शेतकऱ्यांच्या हितासाठी विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे मत डॉ. निळकंठ पाटील यांनी व्यक्त केले.

अध्यक्षस्थानी आदर्श शेतकरी नामदेव खंडू सुर्यवंशी, तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून उत्तमराव थोरात जेष्ठ संघ कार्यकर्ते सहकार महर्षी शेंदुर्णी व प्रमुख पाहूने म्हणून स्त्री रोग तज्ञ डॉ. विजय पाटील, कुरंगी पंढरीनाथ पाटील, पहाण रामकृष्ण पाटील, हरीश पाटील (माहेजी), तुकाराम मिस्तरी, सुशिल सुर्यवंशी, अनुलोन भागजनसेवक सचिन खैरे, किशोर शिनकर, विकास लोहार, जगदीश पाटील (वाडी शेवाळे), प्रविण देशमुख,भावडू पाटील, भगवान तावडे,भिका पाटील, भिमराव बाविस्कर, प्रविण तावडे, राजेंद्र बाविस्कर यांचा कुरंगी – बांबरुड जि.प.गटाचे असंख्य शेतकरी उपस्थित होते.

मी, हॉस्पिटल, डॉक्टरकी करुन स्वतः शेती करतो म्हणून तालुक्यातील शेतकऱ्यांना शेती करताना येणाऱ्या समस्यांची मला माहीती आहे. शेतकऱ्यांना येणाऱ्या समस्या ह्या सोडवण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील राहून शेतकऱ्यांसाठी शेतकरी उत्पादक कंपन्या उभ्या करणे, मका पिकाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होत असल्याने मकासाठी स्टारर्टप कंपन्या, तसेच इथोनाल प्राजेक्ट साठी प्रयत्न करने. शेतरस्ते व शिव रस्ते डांबरीकरण करणे, या भागातील ब सत्ता प्रकारावर तोडगा काढण्यासाठी सरकार दरबारी पाठपुरावा सुरू केला असल्याने हा प्रश्न मार्गी लागलेला आहे. डॉ. निळकंठ पाटील मागदर्शन करतेवेळी म्हणाले

होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत मला चिन्हं मिळाले किंवा नाही मिळाले तरी मी शेतकऱ्यांच्या हितासाठी विधानसभा निवडणूक लढवणार आहे. मला सर्व शेतकरी वर्गाची मदत, आशिर्वाद हवा आहे. मी शेतकरी आमदार असेल. सध्या शेतकरी असल्याची स्पर्धा सुरू आहे. परंतु खरा शेतकरी पुत्र शेतकरी डॉक्टर असल्याने सर्व शेतकरी बांधवांनी मला या वेळेस भरभरून अधिक मताधिक्याने मतांनी विजयी करा, असे आवाहन डॉ. निळकंठ पाटील केले.

प्रास्ताविक किशोर शिनकर यांनी केले. सुत्रसंचलन सचिन खैरे यांनी तर आभार विकास लोहार यांनी मानले. यावेळी सर्व शेतकऱ्यांना बॅग व बळीराजा ची प्रतिमा भेट देण्यात आली.