भरधाव डंपरने तब्ब्ल १५ बकऱ्यांना चिरडले

तरुण भारत लाईव्ह । २९ मार्च २०२३। भरधाव डंपरने महामार्ग ओलांडणाऱ्या तब्बल १५ बकऱ्यांना चिरडले. या अपघातात एकूण १५ बकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला. स्थानिक ग्रामस्थांनी डंपरचालकाला पकडून एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात दिले.

सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, जळगाव-औरंगाबाद महामार्गावरील चिंचोली गावात कैलास लटकन कोळी यांच्याकडे २० ते २५ बकऱ्या आहेत. नेहमीप्रमाणे मंगळवारी सकाळी रानात बकऱ्यांना चारून ते दुपारी चिंचोली गावाकडे आले. त्यांच्यासोबत प्रभाकर इखे, गणेश धुमाळ, कैलास पालवे आणि दिदास बागले यांच्याही बकऱ्या होत्या. कैलास कोळी बकऱ्यांना घेऊन जळगाव-औरंगाबाद महामार्ग ओलांडून नेत असताना, जामनेरकडून जळगावकडे सुसाट येणारा वाळू डंपर (एमएच १९, वाय ७७७३)चालकाने बकऱ्यांना चिरडत नेले.

या अपघातात एकूण १५ बकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनाची माहिती मिळाल्यानंतर ग्रामस्थांनी धाव घेतली व डंपरचालकाला ताब्यात घेतले. या अपघातात शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. डंपरचालकाला एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.