---Advertisement---

२६ वर्षीय विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या; घातपात असल्याचा नातेवाईकांचा आरोप

---Advertisement---

जळगाव : किनोद गावातील २६ वर्षीय विवाहित महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. गायत्री ज्ञानेश्वर कोळी (वय 26) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. मात्र, ही आत्महत्या नसून घातपात असल्याचा आरोप विवाहितेच्या माहेरच्या नातेवाईकांनी केला आहे.

जळगाव तालुक्यातील किनोद येथे गायत्री ज्ञानेश्वर कोळी (वय 26) ही पती, सासू आणि दोन मुलांसह वास्तव्याला होती. गुरुवार, १मे रोजी दुपारी २.०० वाजेच्या सुमारास तिने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेबाबत गायत्रीच्या माहेरच्यांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

दरम्यान, गायत्रीने गळफास घेतल्याचे लक्षात येताच पती, सासू आणि नणंद हे फरार झाले. गायत्रीच्या पश्चात तिचे पती, मुलगा ध्रुव (वय 5), मुलगी नियती (वय 7) असा परिवार आहे. याबाबत जळगाव तालुका पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.

घातपाताचा आरोप

दरम्यान, ही आत्महत्या नसून घातपात असल्याचा आरोप गायत्रीचा भाऊ सागर कोळी, बहीण प्रियंका कोळी आणि मावशी सुनीता कोळी यांनी केला. त्यांनी आरोप केला की, “गायत्रीने मासिक पाळीदरम्यान केलेला स्वयंपाक तिच्या सासू आणि इतरांना चालत नव्हता. यावरून किरकोळ वाद झाला होता. हा वाद विकोपाला गेला. तिने हा प्रकार वडिलांनादेखील सांगितला होता. पण वडील बाहेरगावी गेले होते. असे असताना तिच्या सासू आणि नणंद यांनी घरी येऊन तिला मारझोड केली आणि गळा दाबून खून केला आणि नंतर आत्महत्या केल्याचा बनाव करत गळ्यात साडी बांधून तिला लटकवून दिले.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment