भारत डिजिटल क्रांतीच्या नव्या पर्वात प्रवेश करत आहे आणि यावेळी हे भविष्य केवळ वेगवान नाही तर हॅकप्रूफ असणार आहे. इसो आणि डीआरडीओ या दोन महत्त्वाच्या शास्त्रीय संस्था भारतासाठी अशक्य वाटणाऱ्या सुरक्षित डिजिटल संवादाची रचना करत आहेत आणि यामागील केंद्रबिंदू ‘क्वांटम एंटॅगलमेंट’ नावाचे अजब पण अद्भुत विज्ञान आहे.
अल्बर्ट आइन्स्टाइन यांनी ज्याला ‘स्यूकी ॲक्शन ॲट अ डिस्टन्स’ असे म्हणत गूढ म्हणून संबोधले, ते म्हणजे क्वांटम एंटँगलमेंट. यामध्ये दोन कण (फोटॉन्ससारखे) एकमेकांशी एवढ्या घट्ट पद्धतीने जोडलेले असतात की एका कणावर परिणाम झाला तर दुसऱ्यावरही तितकाच प्रभाव होतो मग ते पृथ्वीवर असो वा अंतराळात.
सायबर सुरक्षेचे नवे युग
आज डिजिटल युगात प्रत्येकजण इंटरनेटवर अवलंबून आहे बँकिंग, संवाद, संरक्षण, आरोग्य व्यवस्था आणि कित्येक गोष्टी ऑनलाइन चालतात. यासाठी डेटा सुरक्षित ठेवणे अत्यावश्यक आहे. सध्याच्या एन्क्रिप्शन प्रणाली ज्या गणिती गुंतागुंतीवर आधारित आहेत, त्या भविष्यात क्वांटम संगणकांच्या समोर निष्प्रभ ठरू शकतात. कारण हे संगणक सेकंदात कोडी उलगडू शकतात. म्हणूनच, ‘क्वांटम की डिस्ट्रीब्युशन’ ही संकल्पना पुढे आली आहे.
यामध्ये संवाद करणारे दोन युझर्स (उदाहरणार्थ ॲलिस आणि बॉब) क्वांटम कणांच्या माध्यमातून सुरक्षित कळांची देवाणघेवाण करतात. जर कोणी तिसरा व्यक्ती (जिला ईव्ह म्हटले जाते) हे ऐकण्याचा प्रयत्न केला, तर लगेचच सिग्नल बदलतो आणि सुरक्षेचा अलार्म वाजतो. क्वांटम संवादासाठी तीन मुख्य मार्ग आहेत फायबर ऑप्टिक, मुक्त हवामार्ग आणि सॅटेलाइट आधारित संवाद. फायन प्रणाली शहरी क्षेत्रांसाठी उपयुक्त असून, मुक हवामार्ग प्रणालीचा उपयोग मोबाइल आणि ग्रामीण भागांतील संवादासाठी केला जात पण खरी क्रांती आहे सॅटेलाइट आधारि संवाद. चीनने आपल्या ‘मिसियस’ उपग्रहाद्ध १२०० किमी अंतरापर्यंत यशस्वी क्वांट संवाद साधला आहे.
भारताने गाठला नवा टप्पा
भारताने या तंत्रज्ञानात पाऊल टाकत एक नवा टप्पा गाठला आहे. इस्रोने ३०० मीटर अंतरावर फोटॉन व लेसरच्या सहाय्याने सुरक्षित व्हिडीओ संवाद यशस्वीपणे पार पाडला आहे. दुसरीकडे, डीआरडीओ आणि आयआयटी दिल्ली यांनी १ किलोमीटरहून अधिक अंतरावर हँकप्रूफ संवाद यशस्वी केला. हे प्रयोग केवळ प्रयोगशाळेपुरते मर्यादित नसून, भारताच्या राष्ट्रीय संरक्षण, अर्थव्यवस्था आणि इन्फ्रास्ट्रक्चरच्या सुरक्षेसाठी निर्णायक ठरणार आहेत.