तुम्ही आयुष्मान कार्डसाठी नोंदणी केली आहे ? जाणून घ्या कसे मिळणार कार्ड

---Advertisement---

 

जळगाव : केंद्र सरकारच्या आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजने अंतगर्त गरजू व वंचित कुटुंबांना मोफत आरोग्यसेवा दिली जाते. या योजनांचा लाभ शहरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळत आहे. शहरात महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत शाहू रुग्णालयात या योजनेसाठी नागरिकांची नोंदणी करण्यात आली होती. तर काही नोंदणी आशासेविका यांनी घरोघरी जाऊन केली होती. या नोंदणीनुसार 31 हजारांहून अधिक आयुष्मान कार्ड तयार झाले असून, त्यांचे वाटप प्रक्रिया राबविण्यात येत आहे.

महापालिकेच्या दवाखाना विभागाने आयुष्मान कार्ड वाटपाकरिता विशेष मोहीमेला प्रारंभ केला आहे. लाभार्थ्यांना आशासेविका घरोघरी जाऊन कार्डचे वाटप करत आहेत. यावेळी, त्या नागरिकांना योजनेबाबत सविस्तर माहिती देत आहेत. तसेच या कार्डवर असणारी मोफत उपचारांच्या सुविधांची माहिती देऊन त्यांच्यात जनजागृती करीत आहेत.

आयुष्मान कार्ड मिळाल्यानंतर नागरिकांना सरकारी तसेच मान्यताप्राप्त खासगी रुग्णालयात वर्षाला ५ लाखांपर्यंत मोफत उपचार घेता येणार आहेत. कुटुंबातील कोणत्याही सदस्याला गंभीर आजार, शस्त्रक्रिया किंवा हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याची गरज भासल्यास या योजनेचा थेट लाभ घेता येणार आहे.

ज्या नागरिकांना अजूनपर्यंत कार्ड मिळालेले नाही त्यांनी आपल्या परिसरातील आशा वर्करशी संपर्क साधावा, असे आवाहन वैद्यकीय अधिकारी डॉ. मनीषा उगले यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---