---Advertisement---
चेतन साखरे
जळगाव : सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याला हिरवा कंदील दिल्याने राजकीय पक्षांनी तयारीला सुरुवात केल्याचे दृष्टिपथास येत आहे. या तयारीत आघाडीवर असलेल्या भारतीय जनता पक्षाने संघटनात्मक बदल करून जिल्हाध्यक्ष जाहीर केले. भाजपने आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जळगाव जिल्ह्यात दोन मराठा आणि एक गुर्जर समाजाच्या चेहऱ्याला प्रतिनिधित्व देऊन ‘सोशल इंजिनीयरिंग साधण्याचा प्रयत्न केला आहे.
भारतीय जनता पक्ष हा पार्टी विथ डिफरन्स’ म्हणून ओळखला जातो. सातत्याने प्रयोग अन् धक्कातंत्राचा वापर करून भाजपने निवडणुका यशस्वीरीत्या जिंकल्या आहेत. लोकसभा निवडणुकीत भाजपची पीछेहाट झाली होती. राज्यात जरी परिणाम झाला असला, तरी जळगाव जिल्ह्यातील तोकसभेच्या दोन्ही जागा भाजपने ‘डंके की चोट पें जिंकल्या. त्यानंतर विधानसभा निवडणुकीत लोकसभेतील चुकांची दुरुस्ती करून महाविकास आघाडीता राज्यात धोबीपछाड दिली.
---Advertisement---
विशेष म्हणजे जळगाव जिल्ह्यात भाजपने विरोधी पक्षाचा एकही आमदार निवडून येऊ दिला नाही थोडक्यात विरोधकच शिल्लक ठेवले नाही. जिल्ह्यातील सर्व ११ आमदार महायुतीचे निवडून आले. इतका जोरदार दणका महाविकास आघाडीला जिल्ह्यात बसला. दरम्यानच्या काळात पक्षांतर्गत बदलाचे वारे वाहू लागले. देश आणि राज्य सरकारचा विकासाचा संदेश गावपातळीवर पोहोचविण्यासाठी आता भाजपने कंबर कसली आहे.
जिल्हा परिषद, पालिका मिशन
ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून गेल्या अडीच वर्षांपासून जिल्हा परिषद महापालिका, नगरपरिषदा अशा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत. नुकतेच सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया चार महिन्यात पूर्ण करण्याचे आदेश दिले. त्यामुळे मिशन जिल्हा परिषद अन् पातिका म्हणत राजकीय पक्षांची आता चांगलीच धावपळ उडाली आहे.
भाजपने भाकरी फिरविली
गत २५ वर्षांपासून जळगाव जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि काही नगरपालिका भाजपच्या ताब्यात आहेत. ही पकड आणखी म जबूत करण्यासाठी भाजपने जळगाव जिल्ह्यात भाकरी फिरवली आहे. संघटनात्मक बदल करून भाजपने तीन जिल्हाध्यक्षांची निवड जाहीर करीत पुन्हा एकदा धक्कातंत्राचा वापर केला आहे. निष्ठावंत आणि सक्रिय काम करणाऱ्या कार्यकर्त्यांवर जिल्हाध्यक्षपदाची धुरा भाजपने सोपविली आहे.
सामाजिक गणित जुळविण्याचा प्रयत्न
जिल्ह्यात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता भाजपने सोशल इंजिनीयरिंग अर्थात सामाजिक गणित जुळविण्याचा प्रयत्न केला आहे. मराठा, गुर्जर, लेवाबद्दल असलेल्या जळगाव जिल्ह्यात भाजपने गणित आखले आहे. आगामी निवडणुकांत मतदारांना आकर्षित करण्यासाठी पूर्व जिल्हाध्यक्ष म्हणून मंत्री गिरीश महाजन यांचे कट्टर सम र्थक चंद्रकांत बाविस्कर, शहर जिल्हाध्यक्ष म्हणून (स्व.) उत्तमराव पाटील यांचे नातू दीपक सूर्यवंशी, असे दोन मराठा आणि पश्चिम जिल्हाध्यक्ष म्हणून गिरीशभाऊ प्रेमी डॉ. राधेश्याम चौधरी यांच्याख्याने गुर्जर अशा दोन्ही समाजांना प्रतिनिधित्व दिले आहे. भाजपचे हे सामाजिक गणित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कितपत यशस्वी ठरते. हे येणारा काळच ठरवेल.