---Advertisement---

हिंदूचा आवश्यक विधींशवाय झालेला विवाह अमान्य ; सुप्रीम कोर्ट

by team
---Advertisement---

नवी दिल्ली : आवश्यक विधी पार न पाडता केलेला हिंदू विवाह वैध म्हणजेच मान्य ठरू शकत नसल्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला आहे. लग्नासंदर्भातील निर्णय हा हिंदू विवाह अधिनियम १९५५ नुसार हिंदू विवाहाची कायदेशीर आवश्यकता आणि पवित्रता यावर दिला आहे. 

हिंदू विवाह वैध ठरविण्यासाठी सप्तपदी सारखे संस्कार करणे आवश्यक आहे. सप्तपदी यात  पवित्र अग्नीभोवती सात फेरे मारण्याचा सोहळा केला जातो. या सोहळ्याला प्रमाण आहे. कोर्टाने पुढे म्हटले आहे की, हिंदू विवाह हा एक संस्कार असून हे काही सॉन्ग डान्स, वायनिंग-डायनिंगचे आयोजन नाही.

भारतीय समाजात हिंदू विवाह हा एक संस्कार असून यास महान मूल्य गृहीत धरून उच्च दर्जा दिला गेला पाहिजे. सुनावणी दरम्यान, न्यायमूर्ती बी नागरत्न यांनी आम्ही तरुण आणि तरुणींना आग्रह करतो की त्यांनी विवाह संस्थेमध्ये प्रवेश करण्याआधी याबाबत गांभीर्याने विचार करावा आणि भारतीय समाजातील ही संस्था किती पवित्र आहे याचा विचार करावा, असे आवाहन केले.

विविहचा अर्थ म्हणजे नाच-गाणे, मद्य पिणे. जेवण करणे एवढाच होत नाही. तसेच हुंडा, गिफ्ट यांची मागणी करणे किंवा इतर वस्तूंची देवाण-घेवाण म्हणजे लग्न नव्हे. विवाह हा काही देवाण-घेवाण करण्याचा व्यवहार नसून भारतीय समाजात विवाहास अन्यनसाधारण महत्व आहे.  पुरुष आणि महिला यांच्यामध्ये संबंध प्रस्थापित करण्याचा तो एक मार्ग आहे. भविष्यात तो अधिक विकसित होऊन कुटुंबामध्ये पती आणि पत्नीचा दर्जा घेतो असं कोर्टाने म्हटलं.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment