---Advertisement---

जळगाव जिल्ह्यात सरासरी ९३ टक्के खरीप पेरण्या, कृषी विभागाची माहिती

---Advertisement---

जळगाव : जिल्ह्यात सुमारे ७ लाख ४६ हजार ४६ हेक्टर पेरणीलायक क्षेत्र आहे. त्यापैकी बागायती ऊस वगळता ७ लाख ४० हजार ५३६ हेक्टर क्षेत्रापैकी ६ लाख ८८ हजार ८०० हेक्टरवर खरीप वाणांची पेरणी झाली असल्याचे कृषी विभागाने म्हटले आहे.

जूनच्या सुरूवातीला मृग नक्षत्रात झालेल्या पावसाने सुरूवातीस काही दिवस खंड दिला होता. परंतु आर्द्रा नक्षत्रात अखेरीस झालेल्या दमदार पावसामुळे खरीप पेरण्यांना वेग आला असून आतापर्यंत सरासरी ९३ टक्के खरीप पेरण्या झाल्या आहेत.

मात्र यावर्षी ५ लाख ४६ हजार ९३३ हेक्टरवर कपाशी वाणाच्या लागवडीचा अंदाज होता. त्यात बरीच घट झाली असून सद्यस्थितीत केवळ ४ लाख २९ हजार ५८० हेक्टरवर बागायत आणि जिरायत कपाशी वाणाची लागवड झाली आहे.

मका वाणाची लागवड वाढली

जिल्ह्यात मका वाणाची लागवड ९२ हजार ६५० हेक्टरवर अपेक्षीत होती. परंतु प्रत्यक्षात १ लाख ७४ हजार ३३९ हेक्टरनुसार १८८ टक्के मका वाणाची लागवड झाली आहे. यात सर्वात जास्त भुसावळ तालुक्याने आघाडी घेतली असून २०४५ हेक्टर लागवड अपेक्षीत असताना तब्बल ५५७३ तर पारोळा तालुक्यात २८५७ हेक्टरऐवजी ७५५३ हेक्टर अर्थात २६४ टक्के क्षेत्रासह अन्य तालुक्यांत देखील सरासरी नुसार १८८ टक्के क्षेत्रात मका वाणाची लागवड झाली आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---