जळगाव: शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नगरातील उड्डाणपुलावरून सिमेंट वाहतूक करणारा ट्रक जाताना अचानक ब्रेक फेल झाले. यामुळे ट्रक उतारावरून रिव्हर्स आल्याने अपघात घडला. यात मागे उभ्या असलेल्या तीन प्रवासी रिक्षांसह पाच दुचाकींना धडक देत चिरडले.
शनिवारी २२ मार्च रोजी दुपारी २.३० वाजतासुरत रेल्वेगेटजवळील मालधक्क्यावरून सिमेंटच्या गोण्या भरून जाणाऱ्या ट्रकचे अचानक ब्रेक फेल झाल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि हा ट्रक उतारावरून मागे आला. त्यामुळे रिक्षा थांब्यावर उभ्या असलेल्या तीन रिक्षांसह तेथील चार ते पाच दुचाकींना चिरडले. यात रिक्षांसह दुचाकी या पूर्णपणे दाबल्या गेल्या.
या घटनेत राधाकृष्ण नगरात राहणारे सुरेश ओस्वाल (वय ५०) हे घरी जात असताना त्यांना रिव्हर्स येणाऱ्या ट्रकने धडक दिली. यामध्ये ओस्वाल यांच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याने ते जखमी झाले. त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. सुरेश रूपचंद जैस्वाल हे रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले आणि एक मुलगी असा परिवार आहे.