---Advertisement---
पुणे : जिल्ह्यात नदीवरील पूल कोसळून मोठा अपघात झाला आहे. अपघातात ४ जणांचा मृत्यू झाला असून सुमारे ३० जण वाहून गेल्याचेही सांगण्यात आले येत आहे. हा अपघात कुंडमाळा जवळील इंद्रायणी नदीवरील पूलावर घडला. दरम्यान, स्थानिक प्रशासन, मदत आणि बचाव पथक अपघातस्थळी पोहचले असून त्यांनी मदत कार्यास प्रारंभ केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या अपघाताबद्दल शोक व्यक्त केला आहे.
मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला आहे. हा पुल शेतकऱ्यांसाठी बांधण्यात आला होता. यापूलाचा वापर शेतकरी पायी येण्यासाठी आणि जाण्यासाठी करीत होते. आज या ठिकाणी पर्यटक आणि दुचाकी वाहनांची गर्दी झाली होती. यामुळे हा पूल कोसळला. या पुलावर एकाचवेळी जवळपास १०० ते १५० लोक एकत्र आले होते, यामुळे हा पुल कोसळला आहे. या घटनेत चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर ६ जणांची प्रकृती गंभीर आहे. या ठिकाणी युद्धपातळीवर बचावकार्य करण्यात आले. या बचाव कार्यांत पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासन आणि एनडीआरएफचे पथकाने मोलाची कामगिरी बजावली.
---Advertisement---

या अपघाताचे कारणही उघड झाले आहे .प्राप्त माहितीनुसार, हा पूल जीर्ण अवस्थेत असल्याने दोन-तीन महिन्यांपूर्वीच बंद करण्यात आला होता, परंतु, पर्यटकांची संख्या वाढल्याने आणि कोणत्याही सुरक्षा व्यवस्थेचा अभाव असल्याने ही दुर्घटना घडली. स्थानिक प्रशासनावर दुर्लक्ष केल्याचा आरोप लोकांनी केला आहे. लोकांनी सांगितले की पूल बंद होता, परंतु लोकांना पुलावर चढण्यापासून रोखण्यासाठी येथे कोणताही सुरक्षा रक्षक उपस्थित नव्हता.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके यांनी सांगितले की, या पुलाची आम्ही वेळोवेळी दुरुस्ती करत होतो. पण या पुलावर दुचाकीस्वरांना प्रवेश नाकारत होतो. पण तरीही काही लोक दुचारीवरून या पुलावरून जात होते. खरं तर अशी दुर्घटना होणं हे दुर्देवी आहे.