Budget 2024 Updates:

Budget 2024: अर्थमंत्री निर्मला सीतारामन मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील शेवटचा अर्थसंकल्प सादर करत आहेत. निर्मला सीतारामन सलग सहाव्यांदा अर्थसंकल्प सादर करत आहेत. हा अंतरिम अर्थसंकल्प असल्याचं म्हटलं जातं, पण हा अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वीच निर्मला सीतारामन यांनी ‘युवक-महिला-गरीब-शेतकरी’ हे सरकारचं प्राधान्य असल्याचं सूचित केलं होतं. सरकारने 2027 पर्यंत देशाला जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनविण्याचे लक्ष्य ठेवले आहे.

80 कोटी लोकांना मोफत धान्य दिले: सीतारामन
निर्मला सीतारामन म्हणाल्या की, देशातील जनता भविष्याकडे पाहत आहे. ते आशावादी आहेत. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली आम्ही पुढे जात आहोत. अर्थव्यवस्थेत सकारात्मक बदल होताना दिसत आहेत. सरकार सबका साथ सबका विकासासाठी काम करत आहे. ते म्हणाले की, आमच्या सरकारने प्रत्येक घरात पाणी, सर्वांना वीज, गॅस, आर्थिक सेवा आणि बँक खाती उघडण्याचे काम केले आहे. अर्थमंत्र्यांनी सांगितले की, अन्नधान्याची चिंता दूर करण्यात आली आहे, 80 कोटी लोकांना मोफत अन्नधान्य देण्यात आले आहे. मूलभूत गरजा पूर्ण झाल्या, त्यामुळे ग्रामीण भागातील लोकांचे उत्पन्न वाढले आहे. 2047 पर्यंत भारत एक विकसित राष्ट्र बनेल, आम्ही लोकांना सक्षम करण्यासाठी काम करत आहोत.

प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत आणखी दोन कोटी घरे बांधली जाणार
अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या, देशाची अर्थव्यवस्था योग्य दिशेने चालली आहे. आमच्या सरकारचे लक्ष पारदर्शक कारभारावर आहे. अर्थमंत्र्यांनी 20 मिनिटे केंद्र सरकारच्या योजनांची गणना केली आणि भारताच्या विकासाच्या गतीवर चर्चा केली. पुढे त्या म्हणाल्या की, प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत पुढील 5 वर्षांत ग्रामीण भागात आणखी दोन कोटी घरे बांधली जातील.