---Advertisement---
येथील उपवनसंरक्षक (मेवासी वनविभाग) कार्यालयात कर्मचारी नसताना चक्क त्यांच्या खुर्थ्यांना पंख्याची हवा घातली जात असल्याचे चित्र शुक्रवारी दुपारी दिसून आले. कार्यालयातील कर्मचारी बाहेर जाताना उपकरणे बंद ठेवणे अपेक्षित असताना, ती सुरूच ठेवत असल्याने विजेचा अपव्यय होत आहे. या प्रकाराबद्दल नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
तळोदा येथील उपवनसंरक्षक मेवासी वनविभाग कार्यालयात १३ जून रोजी दुपारी अडीच ते तीन वाजेच्या सुमारास भेट दिली असता या कार्यालयातील कर्मचारी दुपारी जेवणासाठी बाहेर गेल्याचे सांगण्यात आले. कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या अधिकाधिक खुर्च्य रिकाम्या असल्याचे दिसून आले.
---Advertisement---
या रिकाम्या खुच्र्यांवर बसवण्यात आलेले सर्व पंखे हवा घालत असल्याचे दिसून आले. सुमारे अर्धा ते एक तास कार्यालयात हीच स्थिती होती. या कार्यालयातील कर्मचारी जेवणासाठी किंवा इतरत्र गेल्याने त्यांनी अथवा इतर कर्मचाऱ्याने रिकाम्या खुच्र्त्यांना हवा घालणारा एकही पंखा बंद करण्याची तसदी घेतली नसल्याने या कार्यालयात विजेची किती बचत केली जात असेल हे स्पष्ट दिसून आले.
एरवी आपल्या स्वतःच्या घरातून बाहेर पडताना घरातील सर्व बल्ब तसेच पंखे बंद असल्याची खात्री केल्याशिवाय बाहेर पडत नाही अन्यथा त्याचा आर्थिक फटका सहन करावा लागेल, याची जबाबदारीने जाणीव सद्यःस्थितीत प्रत्येक कर्मचारी ठेवून आहे, मात्र शासकीय कार्यालयातील हे दृश्य बरेच काही बोलून गेले.
दरम्यान, उपवनसंरक्षक लक्ष्मण पाटील हे बाहेर असल्याचे सांगण्यात आले. कार्यालयातील या स्थितीमुळे त्यांचे कर्मचाऱ्यांवर कार्यालयीन शिस्तीबाबत किती नियंत्रण आहे, याबाबत चर्चा होत आहे.