एनडीए सरकारमुळे देशाचा विकास : पंतप्रधान मोदी

 

नांदेड : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात प्रचार सभा घेत आहेत. त्यांनी वर्धा, नांदेड व परभारणी येथे सभा घेतल्या आहेत. नांदेड सभेत एनडीए सरकारमुळे देशात विकास होत असल्याचे सांगताना इंडिया आघाडीवर टीकास्त्र सोडले.

 

नायगाव परिसरामध्ये केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी भाजप महायुतीचे उमेदवार विद्यमान खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या प्रचारार्थ आठ दिवसांपूर्वी जाहीर सभा घेतली होती. यानंतर, आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सभा घेतली. यावेळी माजी मु्ख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या आठवणींना उजाळा देत नांदेडकरांशी स्थानिक नाळ जोडली. पहिल्या टप्प्यात एनडीएला एकतर्फी मतदान झाला असून याच मतदानातून देशाचं भविष्य ठरतं, असे मोदींनी म्हटले. आपल्या भाषणातून पुन्हा एकदा मोदींनी काँग्रेस व इंडिया आघाडीवर हल्लाबोल केला. गरीब, शेतकरी, मजदूर आणि सर्वसामान्यांच्या विकासाच्या आड काँग्रेसकडून भींत टाकली जाते. आजही एनडीए सरकारकडून होत असलेल्या गरीबांच्या विकासकामांची खिल्ली उडवली जाते असे त्यांनी सांगितले.