हिंगोलीत भीषण अपघात; 150 मेंढ्यासह, चौघांचा मृत्यू

तरुण भारत लाईव्ह । २५ मे २०२३। महाराष्ट्रातील हिंगोली जिल्ह्यात मेंढ्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची दुसऱ्या ट्रकला धडक बसली. ही धडक इतकी भीषण होती की या अपघातात दोन्ही ट्रकमधील चार जण आणि 150 मेंढ्या ठार झाल्या.

सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, पहाटे चार वाजता मेंढ्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची विरुद्ध दिशेने येणाऱ्या टाईल्सने भरलेल्या ट्रकला धडक बसली. कळमनुरी पोलिस निरीक्षक बैजनाथ मुंडे यांनी ही माहिती दिली. या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला. मृत्युमुखी पडलेले चार जण मेंढ्या घेऊन जाणाऱ्या ट्रकमधून प्रवास करत होते.

अपघातामुळे काही काळ रस्त्यावरील वाहनांची वाहतूक थांबवावी लागली. मात्र, पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने काही तासांच्या प्रयत्नानंतर रस्ता मोकळा करून वाहतूक सुरळीत केली.