अपंग व्यक्तींसाठी सरकारची योजना; जाणून घ्या सविस्तर

तरुण भारत लाईव्ह ।१४ फेब्रुवारी २०२३। अपंग निवृत्ती वेतन योजनेंतर्गत दिव्यांग व्यक्तींना केंद्र व राज्य अशा दोन्ही ठिकाणी निवृत्ती वेतनाची सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे. या योजनेंतर्गत दिव्यांग व्यक्तींना इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंगत्व निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत दरमहा 200 रुपये मिळतात. तसेच, संजय गांधी निर्धार धन योजनेंतर्गत राज्य सरकारकडून दरमहा 400 रुपये मिळतात. म्हणजेच एकूण महाराष्ट्रातील अशा शारीरिक अपंग व्यक्तीला दरमहा 600 रुपये पेन्शन मिळेल.

या योजनेंतर्गत महाराष्ट्र राज्यात राहणाऱ्या दिव्यांगांना, ज्यांचे वय १८ ते ६५ वयोगटातील आहे, त्यांना आर्थिक मदत मिळेल.
महाराष्ट्र राज्यात राहणार्‍या दिव्यांग उमेदवारांना किमान 80 टक्के अपंगत्व असले पाहिजे, तरच ते या योजनेत अर्ज भरू शकतात.
या योजनेत अर्ज भरणारी व्यक्ती महाराष्ट्रातील रहिवासी असावी.
त्याच्याकडे रहिवाशाचा पुरावा म्हणून आधार कार्ड किंवा मतदार ओळखपत्र असणे आवश्यक आहे.
विकलांग पेन्शन योजना महाराष्ट्र दस्तऐवज
या योजनेंतर्गत, अपंग लोक ऑफलाइन पद्धतीने आपला अर्ज नोंदवू शकतात, यासाठी त्यांना त्यांची आवश्यक कागदपत्रे देखील सादर करावी लागतील, ज्यांची यादी खाली दिली आहे:-

अर्जदाराचे रहिवासी प्रमाणपत्र, अपंग व्यक्तीचे अपंगत्व प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, वयाचा पुरावा म्हणून मतदार ओळखपत्र, आधार कार्ड, बँक खाते माहिती
फोटो, मोबाईल नंबर इ.