पश्चिम बंगालमध्ये हिंदूंना दुय्यम दर्जाचे नागरिक बनवण्यात आले : पंतप्रधान मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी पश्चिम बंगालमधील बराकपूर येथे निवडणूक रॅलीला संबोधित केले. यावेळी त्यांनी टीएमसी, काँग्रेस आणि डाव्यांवर जोरदार निशाणा साधला. ममता सरकारवर हल्लाबोल करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, पश्चिम बंगालमध्ये हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक बनवण्यात आले आहे. ते हिंदूंना नदीत बुडवतील, असे TMC नेते सांगतात.

पंतप्रधान म्हणाले की, टीएमसीच्या राजवटीत पश्चिम बंगालमध्ये बॉम्ब बनवण्याचा गृहउद्योग सुरू आहे. घुसखोर टीएमसीच्या संरक्षणाखाली फोफावत आहेत. बंगालमधील ममता सरकार रामाचे नाव घेऊ देत नाही. हे सरकार बंगालमध्ये रामनवमी साजरी करू देत नाही. बंगालमध्ये यावेळी वेगळेच वातावरण असल्याचे येथील चित्र दिसत आहे. काहीतरी वेगळे घडणार आहे.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, काँग्रेस आणि डाव्या पक्षांनी राम मंदिराविरोधात आघाडी उघडली आहे. काँग्रेसचे लोक मोदींच्या विरोधात व्होट जिहाद करू असे म्हणतात. मुस्लिमांना संपूर्ण आरक्षण द्यायला हवे असे हे लोक म्हणत आहेत. कर्नाटकात काँग्रेसने मुस्लिमांना ओबीसी आरक्षण दिले. बंगालच्या जनतेने सावध राहण्याची गरज असल्याचे पंतप्रधान म्हणाले.