शांततेचा भंग करणाऱ्यांनो सावधान; कारण नंदुरबार मध्ये चार जणां..

तरुण भारत लाईव्ह न्यूज । २९ नोव्हेंबर २०२२ । सध्या आपापसात भांडण करून शांततेचा भंग करणाऱ्याचे प्रमाण वाढले आहे. अशीच एक बातमी नंदुरबार मध्ये समोर आले असून आपापसात भांडण करून शांततेचा भंग करणाऱ्या चौघांविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदुरबार शहरातील धुळे नाका परिसरात चार जण शांततेचा भंग करून आपापसात भांडण करताना आढळून आले. त्यांच्याविरुद्ध पोशी. उमेश वारे यांच्या फिर्यादीवरून नंदुरबार शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला, पुढील तपास पोना. अमोल जाधव करत आहेत.