विधानसभेच्या निवडणुकीत महायुती १७५ जागा जिंकणार : मंत्री गिरीश महाजन

जामनेर  :  शेतकऱ्यांसह राज्यातील सर्व घटकांच्या सर्वांगीण विकासाच्या जोरावर येत्या विधानसभेच्या निवडणुकीत महायुती १७५ च्यावर जागा जिंकणार असल्याचा विश्वास राज्याचे ग्राम विकास तथा पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केला . शहरातील एकलव्य शाळेच्या आवारात आयोजीत भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यात मंत्री महाजन बोलत होते .
यावेळी व्यासपिठावर अजय भोळे ,चंद्रकांत बाविस्कर , संजय गरुड ,प्रदिप लोढा , दिलीप खोडपे ,जे. के. चव्हाण ,नाना पाटील, शेख अनिस , नाजीम पार्टी ,आतीष झाल्टे, डॉ .प्रशांत भोंडे , तुकाराम निकम,  गोविंद अग्रवाल , प्रा .शरद पाटील, कैलास पाटील,  रवींद्र झाल्टे आदी मान्यवर उपस्थित होते .
नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत मित्र पक्षांसह भाजपच्या विरोधात खोटे-नाटे आरोप करण्यात आले. शिवाय विरोधकांनी निवडणुकीत जनतेला वारेमाप आश्वासन दिले होते ,जे कधीच पुर्ण होणार नव्हते असाही आरोप  मंत्री महाजन यांनी केला. ते पुढे म्हणाले की,  विरोधकांनी सर्व जंग  जंग पछाडुनही नरेंद्र मोदी तीसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान झाले. .येत्या काळात तालुक्यासह जिल्हाभरात मोठ्या प्रमाणात सिंचनाच्या सुविधा उपलब्ध होणार आहेत. बोदवड उपसा सिंचन योजना, भागपुर अशा काही कारणास्तव धिम्या गतीने सुरू असलेल्या बहुतांश सिंचन प्रकल्प ,पाचोरा ते बोदवड रेल्वे मार्ग आदींसाठीची कामे लवकरच सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
 दरम्यान अजय भोळे, प्रा. शरद पाटील ,चंद्रकांत बाविस्कर ,श्री अग्रवाल आदींची समयोचीत भाषणे झाली .  “लाडली बहीण “योजनेबाबत वक्त्यांनी आपल्या संबोधनात विस्तृत माहिती दिली. मयुर पाटील यांनी सुत्रसंचालन तर रवींद्र झाल्टे यांनी आभार मानले.  मेळाव्याला मतदार संघातुन मोठ्या संख्येने भाजपचे पदाधिकारी-कार्यकर्ते ,नागरिक उपस्थित होते.