---Advertisement---

रिधुर-नांद्रा-चांदसर रस्त्यावरील पुलाचे लोकार्पण; विदगाव परिसरातील ७५० महिलांना भांडे संच वाटप

---Advertisement---

जळगाव : रिधुर-नांद्रा-चांदसर-कवठळ परिसरातील नागरिकांच्या वर्षानुवर्षांच्या मागणीनुसार नव्याने उभारण्यात आलेल्या पुलाचे लोकार्पण व विदगाव येथील ७५० महिलांना भांडे संच वाटप पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. पावसाळ्यात शेतकरी व ग्रामस्थांना होणाऱ्या त्रासावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी शासनाच्या अर्थसंकल्पातून रु. २ कोटी ९ लाखांचा निधी मंजूर करून हा पूल उभारण्यात आला आहे. पुलाच्या लोकार्पणप्रसंगी पालकमंत्री म्हणाले, “हा पूल केवळ दळणवळणाचे साधन नसून, हा या भागातील ग्रामस्थांसाठी नवसंजीवनी ठरेल. ग्रामस्थांची जुनी मागणी पूर्ण झाली असून पावसाळ्यातील अडथळ्यांपासून आता मुक्ती मिळेल.”

---Advertisement---

तत्पूर्वी विदगाव येथे आयोजित कार्यक्रमात ७५० कामगार महिलांना भांडे संच वाटप करण्यात आले. “हा संच केवळ सहाय्य नव्हे, तर महिलांच्या कष्टाला दिलेला सन्मान आहे,” असे भावनिक उद्गार पालकमंत्री ना. पाटील यांनी यावेळी व्यक्त केले. प्रास्ताविक पंचायत समितीच्या माजी सभापती ललिता जनाआप्पा कोळी यांनी केले. राजू कोळी यांनी सूत्रसंचालन केले, तर जनाआप्पा कोळी यांनी आभार मानले.
याप्रसंगी तालुकाप्रमुख शिवराज पाटील, सभापती जनाआप्पा कोळी, डॉ. कमलाकर पाटील, तुषार महाजन, जितू पाटील, सरपंच चुडामन कोळी, उपसरपंच राजू कोळी, महेंद्र कोळी, मुरलीधर कोळी, ज्ञानेश्वर कोळी, निलेश कोळी, गजानन सोनवणे, शालिक पाटील, सुनील पाटील, देवेंद्र कोळी, भगवान कुंभार, बळीराम कोळी यांचा समावेश होता. या कार्यक्रमाला विदगाव, नांद्रा, रिधुर, कानळदा परिसरातील शेतकरी, स्थानिक पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---