इंडिया आघाडीत ‘या’ नेत्यांपैकी कुणीही पंतप्रधान होऊ शकतं, राऊतांनी सांगितले चार नावं…

Maharashtra Politics : इंडिया आघाडीकडे पंतप्रधानपदाचा चेहरा नसल्याची टीका अजित पवार यांनी केली होती. आता या टीकेला उबाठा गटाचे नेते तथा खासदार संजय राऊत यांनी उत्तर दिलं आहे. इंडिया आघाडीची सत्ता आल्यास चार नेत्यांपैकी कुणीही पंतप्रधान होऊ शकतं, असं संजय राऊत म्हणाले आहेत.

कोणते नेते पंतप्रधान होऊ शकतात ?
संजय राऊतांनी राहुल गांधी, प्रियांका गांधी, मल्लिकार्जुन खर्गे आणि उद्धव ठाकरे यांच्यापैकी कुणीही पंतप्रधान होऊ शकतं, असं म्हटलं आहे. तसेच युतीकडे गेल्या 10 वर्षांपासून एकच चेहरा आहे. पण आमच्याकडे बरेच पर्याय आहेत, असेही संजय राऊतांनी म्हटलं आहे.