भारत आणि अमेरिकेदरम्यान शांतता व स्थिरता राखण्यास भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिती आणि अमेरिकेचे उप-परराष्ट्रमंत्री क्रिस्टोफर लॅण्डौ यांनी सहमती दर्शविली आहे. बुधवारी वॉशिंग्टनमध्ये लॅण्डौ यांच्याशी मिसी यांची पहिली बैठक झाली. या बैठकीत त्यांनी भारत-अमेरिका द्विपक्षीय संबंधांची संपूर्ण व्याप्ती आणि सामायिक प्राधान्यांवर चर्चा केली, असे वॉशिंग्टनमधील भारतीय दूतावासाने वरील पोस्टमध्ये म्हटले आहे.
लॅण्डौ यांनी अमेरिका आणि भारत यांच्यातील घनिष्ठ भागीदारीची पुष्टी केली. ही भागीदारी २१ व्या शतकातील अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणाचा एक महत्त्वाचा घटक आहे, असे परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते टॅमी ब्रूस यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. दोन्ही देशांमध्ये आर्थिक वाढ आणि समृद्धी वाढवण्यासाठी लॅण्डौ यांनी निष्पक्ष आणि परस्पर बाजारपेठेतील प्रवेशाचे महत्त्व अधोरेखित केले. स्थलांतर व अंमली पदार्थविरोधी कारवाईवर वाढीव सहकार्याचे महत्त्व अधोरेखित केले. असे ब्रूस म्हणाले.
मिसी आणि उप-राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पवन कपूर यांनी भारतीय तर उपराष्ट्रपती जे. डी. व्हान्स यांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अॅण्डी बेकर व उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून नवीन जबाबदारी स्वीकारणारे सल्लागार मायकेल नीडहॅम यांनी अमेरिकन शिष्टमंडळाचे नेतृत्व केले. व्हाईट हाऊसमधील चर्चा उपक्रमाची अंमलबजावणी, संरक्षण आणि ऊर्जा क्षेत्रात सहकार्य पुढे नेणे आणि २२ उपक्रमांना बळकटी देणे यावर केंद्रित होती, असे दूतावासाने म्हटले आहे.
मंगळवारी, मिस्री यांनी वॉशिंग्टनमध्ये अमेरिकेचे अंडर सेक्रेटरी जेफ्री केसलर यांची भेट घेतली. महत्त्वाच्या व उदयोन्मुख तंत्रज्ञानात द्विपक्षीय सहकार्य वाढवण्याचा प्रयत्न केला, असे भारतीय दूतावासाने म्हटले आहे. ही भेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फेब्रुवारीमध्ये झालेल्या अमेरिकेच्या भेटीचा पाठपुरावा आहे.
दोन्ही देशांनी २१ व्या शतकासाठी भारत-अमेरिका कॉम्पॅक्ट (लष्करी भागीदारी, जलद वाणिज्य आणि तंत्रज्ञानासाठी उत्प्रेरक संधी) सुरू केली होती, असे भारतीय दूतावासाने म्हटले आहे. त्यांनी तंत्रज्ञान व व्यापार सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी भारत-अमेरिका धोरणात्मक व्यापार संवाद लवकर आयोजित करण्यावर सुद्धा चर्चा केली, असे दूतावासाने म्हटले आहे.