---Advertisement---

IPL 2025 : इतिहासात पहिल्यांदाच घडला चमत्कार, आरसीबी चॅम्पियन होताच ‘ते’ झालं शक्य

---Advertisement---

आयपीएल २०२५ चे विजेतेपद आरसीबी संघाने पंजाब किंग्जचा ६ धावांनी पराभव करून जिंकले. आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना पंजाब समोर १९० धावा लक्ष्य ठेवलं . त्यानंतर मात्र पंजाब किंग्जला आरसीबीने १८४ धावांवर थांबवून. तब्बल १८ वर्षांनी विजेतेपद आपल्या नावे लिहिलं.

आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच वेगवेगळ्या संघांनी सलग चार हंगामात आयपीएलचे विजेतेपद जिंकले आहे. गुजरात टायटन्सने आयपीएल २०२२ चे विजेतेपद जिंकले, चेन्नई सुपर किंग्जने २०२३ चे विजेतेपद जिंकले, कोलकाता नाईट रायडर्सने २०२४ चे विजेतेपद जिंकले आणि आरसीबी २०२५ मध्ये चॅम्पियन बनले. आयपीएलमध्ये यापूर्वी कधीही असे घडले नव्हते की वेगवेगळ्या संघांनी सलग चार हंगामात विजेतेपद जिंकले असेल.

१८ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आरसीबी चॅम्पियन

आरसीबी संघ यापूर्वी तीन वेळा अंतिम फेरीत पोहोचला होता. परंतु संघाला यावेळीच विजय मिळाला. हंगामापूर्वी, आरसीबीने रजत पाटीदारला कर्णधार बनवले आणि त्याच्या नेतृत्वाखाली, आरसीबीने दीर्घ प्रतीक्षेचा अंत केला आणि ट्रॉफी जिंकली. विराट कोहली, जोश हेझलवूड, फिल साल्ट, कृणाल पांड्या आणि जितेश शर्मा यांनी संघासाठी उत्कृष्ट कामगिरी केली.

कृणाल पांड्याच्या कामगिरीची कमाल

पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्यात कृणाल पांड्याने चार षटकांत १७ धावा देत दोन विकेट्स घेतल्या. त्याच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी त्याला सामनावीराचा पुरस्कार मिळाला. त्याच्यामुळे पंजाब किंग्जचे फलंदाज मोठे फटके मारू शकले नाहीत आणि बाद झाले. त्याच्याशिवाय, भुवनेश्वर कुमारनेही महत्त्वाच्या क्षणी दोन विकेट्स घेतल्या. त्याआधी, आरसीबीसाठी विराट कोहलीने ३५ चेंडूत ४३ धावा केल्या. कर्णधार रजत पाटीदारने २६ धावांचे योगदान दिले. शेवटी, जितेश शर्माने १० चेंडूत २४ धावा केल्या, ज्यामध्ये दोन चौकार आणि दोन षटकार मारले.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment