Jalgaon News : सॅक बार, ट्रॉली आणि वाहनतळ व्यवस्थापनासाठीच्या निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहेत. विमानतळाच्या विस्तारीकरणामुळे व्यापारी, उद्योजक, विद्यार्थी आणि सर्वसामान्य प्रवाशांना अधिक सेवा सुविधा मिळतील. यामुळे आर्थिक आणि औद्योगिक वाढीस हातभार मि ळेल, असे खासदार स्मिता वाघ यांनी सांगितले.
लवकरच विमानतळाच्या विकासाला वेग मिळणार आहे. जळगाव विमानतळाचा विस्तार आणि सुविधांसंदर्भात खासदार स्मिता वाघ यांनी केंद्र शासनाकडे पाठपुरावा केला होता. यास केंद्र सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. जळगाव विमानतळावर नवे विस्तार, टर्मिनल सुविधा सुधारणा, विमानसेवा वाढवणे आणि एकूणच विमानतळाच्या क्षमता वाढविण्याच्या मागण्या करण्यात आल्या होत्या. यात नागरी विमान मंत्रालयाने गांभीर्याने लक्ष दिले आहे.
जिल्ह्याच्या विकासासाठी जळगाव विमानतळ महत्त्वाचे असून, भविष्यात अधिक सुविधा आणि सेवा मिळविण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचेही खासदार स्मिता वाघ यांनी म्हटले आहे. नागरी विमानमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले की, जळगाव विम नितळाच्या टर्मिनलचा विस्तार ५०० चौरस मीटरपर्यंत केला जात आहे. यात प्रस्थान आणि आगमन लाउंजम ध्ये प्रत्येकी ७५ प्रवासी क्षमता असेल, तसेच सॅक बार, ट्रॉली आणि वाहनतळ व्यवस्थापनासाठीच्या निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहेत. यामुळे प्रवाशांना चांगल्या सुविधा उपलब्ध होतील. विमानतळाच्या विस्तारीकरणामुळे व्यापारी, उद्योजक, विद्यार्थी आणि सर्वसामान्य प्रवाशांना अधिक सेवा सुविधा मिळतील. यामुळे जळगाव आणि परिसरातील आर्थिक आणि औद्योगिक वाढीस हातभार मिळेल. विमानतळ विकासाचा आराखडा अंतिम टप्प्यात असून, भविष्यात टर्मिनल आणि एप्रन उत्तरेकडे हलविण्याचा प्रस्ताव आहे.
तसेच विमानतळाच्या पायाभूत सुविधांच्या विस्तारासाठी विस्तृत नियोजन करण्यात आले आहे. भविष्यात प्रवासी संख्या लक्षात घेता आवश्यकतेनुसार विमानसेवा वाढीचा विस्तार करण्यात येईल, असेही विमानतळ प्राधिकरण मंत्रालयाने म्हटले आहे. खासदार स्मिता वाघ यांनी जळगावसाठी अधिक विमानसेवा सुरू करण्याची मागणी केली होती. त्यानुसार सध्या कोणत्याही प्रवासी सेवांकडून अतिरिक्त विमानसेवेसाठी प्रस्ताव आलेला नसला, तरी भविष्यात मागणी आल्यास त्यावर सकारात्मक विचार करण्यात येईल, असेही मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
जळगाव विमानतळाच्या सुधारणा आणि विस्तारासाठी केंद्र सरकार सकारात्मक आहे. हे प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला जात आहे. विमानसेवा मिळविण्यासाठी व्यापारी, उद्योजक आणि नागरिकांसोबत संवाद साधून उपाययोजनांची आखणी केली जाईल. जळगाव विमानतळाच्या विकासामुळे येथील व्यावसायिक, औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्राला मोठी चालना मिळणार आहे. उत्तम हवाई सुविधा मिळाल्यास जळगाव आणि परिसरात नवीन गुंतवणूकदार येण्यास प्रोत्साहन मिळेल आणि पर्यटन क्षेत्रालाही नवी दिशा मिळेल. जळगावसारख्या वाढत्या शहराला सक्षम विमानसेवा असणे गरजेचे आहे आणि यासाठी स्थानिक स्तरावरूनही अधिक पाठपुरावा करण्यात येणार असल्याचेही खासदार वाघ यांनी म्हटले आहे.