जळगाव : चष्मा घेण्यासाठी आलेल्या ग्राहक आणि दुकानदारात वाद झाल्याची घटना सोमवारी (९ जून) रोजी दुपारी गोलाणी मार्केटमध्ये घडली. हा वाद विकोपाला जात व्यापाऱ्यांना आपली दुकाने बंद करण्यास भाग पाडले. या सर्व प्रकारामुळे दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नामे दिनेश निलेश चौधरी हा तरुण गोलाणी मार्केट मध्ये मोबाईल रिपेरिंग करण्यासाठी आला होता. मोबाईल रिपेरिंग झाल्यानंतर तो चष्मा घेण्यासाठी शाहरुख शेख अक्तर या दुकानदाराकडे गेला. दरम्यान, चष्म्याच्या किंमतीवरून दोघांत वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्याने व्यापारांनी एकामागे एक आपली दुकाने बंद केली.
तसेच या घटनेत व्यापारी व वाद झालेल्या ग्राहक यांच्यात हाणामारी देखील झाली. यात काही जण जखमीदेखील झाले आहे. दरम्यान, जवळपास अर्धातास हा वाद सुरु राहिल्याने मार्केटमधील बहुतांशी दुकाने बंद झाली होती. या सर्व प्रकारामुळे दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.