Jalgaon News: चौघे मित्र तलावाकडे गेले पोहण्यास उतरले, पण क्षणात अनर्थ घडलं

जळगाव : चौघे मित्र मेहरुण तलावाकडे गेले पोहण्यास उतरले. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने ते गटांगळा खाऊ लागले. यात एकाचा मृत्यू तर तिघे गंभीर झाले. शुक्रवार, २९ रोजी दुपारी ही घटना घडली. शेख ईशान शेख वसीम (११) असे मृत मुलाचे नाव आहे.ईशान याच्यासह मोईमखान अमिनखान (१२), आयाम तसलिम भिस्सी (१३) तसेच अर्सलान शेख सलाउद्दीन (१३) सर्व रा.शाहुनगर हे मित्र आज दुपारी मेहरुण तलावाकडे गेले.

पोहोण्यासाठी चौघे तलावात उतरले. परंतु पाण्यात ते गटांगळा खाऊ लागले. काही प्रत्यक्षदर्शीनी चौघांना पाण्यातून बाहेर काढले. एमआयडीसी पोलीसही तलावाकडे पोहाचले. तीन ते साडेतीन वाजेच्या सुमारास घटना घडली. चौघांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणले असता तपासणीअंती ईशान शेख याला डॉक्टरांनी मृत घोषीत केले. अन्य अत्यवस्थेतील तिघा मुलांच्या पोटातून डॉक्टरांनी पाणी काढत उपचार सुरु केले. घटना कळताच शाहुनगरातील नागरिकांनी रुग्णालयात धाव घेतली. शाहूनगरात शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त केली जात आहे. तिघां मुलांना अधिकच्या उपचारासाठी खाजगी हॉस्पिटलमध्ये हलविल्याचे उपस्थितांकडून सांगण्यात आले.ईशान शेख हा कुटुंबात एकुलता होता. त्याच्या पश्चात दोन बहिणी आई, वडील असा परिवार आहे. हे मुले आठवी नववीचे विद्यार्थी असल्याचे सांगण्यात आले.