---Advertisement---

Pahalgam Terror Attack : जळगावात शिवसेनेकडून तीव्र निषेध; पाकिस्तानला दिलं थेट आव्हान

---Advertisement---

जळगाव : जम्मू कश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांकडून झालेल्या भ्याड हल्ल्यात 28 भारतीयांचा मृत्यू झाला. यात महाराष्ट्रातील सहा पर्यटकांचा समावेश असून, अनेक जण जखमी झाल्याची समोर आली आहे. या घटनेनंतर संतापाची लाट उसळली असून, देशभरात तीव्र निषेध व्यक्त करण्यात येत आहे. जळगावातही टॉवर चौकात शिवसेना (शिंदे गट) पक्षाकडून पाकिस्तानचा झेंडा जाळत निषेध नोंदवण्यात आला. ”आतंकवाद मुर्दाबाद, पाकिस्तान मुर्दाबाद’ अश्या घोषणा देत, निर्दोष व्यक्तिमत्वावर हल्ला करून नामर्दपणा दाखवण्यापेक्षा, हिंमत असेल तर युद्धाची घोषणा करा’, असे थेट आव्हान पाकिस्तानला देण्यात आले. यावेळी शिवसेना (शिंदे गट) जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान, दहशतवाद्यांनी पर्यटकांवर भ्याड हल्ला करण्यापूर्वी त्यांना धर्म विचारले, काहींना पँटही काढायला सांगितले. त्यानंतर दहशतवाद्यांनी गोळ्या झाडल्या, अशी भयावह माहिती समोर आली असून, राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून सखोल तपास सुरु आहेत.

जळगाव जिल्ह्यातील पर्यटक सुखरूप

जळगावच्या नेहा वाघुळदे व त्यांच्या मैत्रिणीदेखील जम्मू कश्मीरमध्ये पर्यटनासाठी गेलेल्या आहेत. जम्मू कश्मीरमध्ये हल्ल्या झाल्याची बातमी धडकताच नेहा वाघुळदे यांचे पती तुषार वाघुळुदे अस्वस्थ झाले होते. पत्नी नेहाला फोनवर संपर्क साधला असता ते सुरक्षित असल्याची माहिती दिली. सैन्य दलाने घटनेनंतर सुरक्षित स्थळी हलवून अनेकांचे प्राण वाचवले. सुरक्षित स्थळी हलवल्यानंतर आज नेहा वाघुळदे व त्यांच्यासोबत असलेल्या जिल्ह्यातील व मुंबईतील सर्व मैत्रिणींचा ग्रुप असुरक्षित कटराकडे रवाना झाल्याची माहिती तुषार वाघुळदे यांनी दिली.

तसेच चाळीसगाव येथील रहिवाशी देवयानी ठाकरे याही काश्मीर येथे आहेत. त्या म्हणाल्या की, आम्ही चाळीसगाववरून 14 लोक परवा पहलगाममध्ये येथे आलो, काल श्रीनगरमध्ये स्टे केला, त्यानंतर सोनबर्गला गेलो, मात्र या दुर्दैवी घटनेमुळे खूप घाबरलो आहोत. बाहेरची परिस्थिती पाहिली तर बाहेर हाय अलर्ट आहे. जागोजागी सैनिक तैनात आहेत. त्यामुळे लवकरात लवकर या ठिकाणाहून जाण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी करत सध्या सुरक्षित असल्याची माहिती देवयानी ठाकरे यांनी दिली.

विद्यार्थ्यांनी वाहिली श्रद्धांजली

चाळीसगाव येथील व्ही.एच. पटेल प्राथमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी पहलगाममध्ये दहशतवाद्यांच्या हल्ल्यात ठार झालेल्या भारतीयांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी विद्यार्थ्यांनी मेणबत्त्या लावून श्रद्धांजली अर्पण केली.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment