---Advertisement---

तोयबाच्या मुजम्मिल हाजमीची भारताला युद्धाची धमकी, बांगलादेशातील सत्तांतर केल्याचा दावा

---Advertisement---

संयुक्त राष्ट्रांनी घोषित केलेला दहशतवादी आणि लश्कर ए तोयबाचा कमांडर मुजम्मिल हाजमीने भारताला युद्धाची धमकी दिली आहे. एवढेच नव्हे तर बांगलादेशात ५ ऑगस्ट २०२४ रोजीचे सत्तांतरही घडविल्याचा दावाही केला. मुजम्मीलने एका व्हिडिओद्वारे दावा केला आहे की, शेख हसीना यांचे सरकार पाडण्यात त्यांचाच हात होता. या व्हिडिओत हाजमीने भारताला थेट युद्धाची धमकी दिली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात आक्षेपार्ह भाषा वापरली आहे.

व्हिडिओमध्ये हाजमीने ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख करत बांगलादेशात सरकार उलथवून टाकल्याचा दावा केला आहे. आम्ही मागील वर्षी बांगलादेशात मोदींना मात दिली. तुम्ही ७ मे रोजी अंधारात आले, आम्ही १० मे रोजी उजेडात आलो. तूम्ही मैदानात आले, तर आम्हीही येऊ, अशा शब्दांत हाजमीने धमकी दिली आहे.

या संपूर्ण घटनाक्रमानंतर बांगलादेशात अराजकतेचं वातावरण आहे. शेख हसीना यांच्या पलायनानंतर जनरल वाकर उज जमान यांच्या नेतृत्वात लष्करी पाठबळासह सरकार स्थापन करण्यात आलं होतं. त्यानंतर मोहम्मद युनूस यांना अंतरिम सरकारची सूत्रे सोपवण्यात आली. मात्र, या सरकारविरोधात आता राजकीय पक्ष, सैन्य, शासकीय कर्मचारी आणि शिक्षक यांच्यात नाराजी आहे.

पूर्वेत भारतासमोर आव्हान

बांगलादेशातील सत्तांतरामागे परकीय शक्तींचा हात असल्याचा आरोप पूर्वीच झाला होता. विशेषतः, विद्यार्थ्यांच्या आंदोलनामागे पाकिस्तानी समर्थक असलेल्या जमात-ए-इस्लामी या संघटनेचा हात असल्याचे बोलले जात होते.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment