Maharashtra Budget 2024 : अर्थमंत्र्यांनी अंतरिम अर्थसंकल्पात केल्या ‘या’ मह्त्वाच्या घोषणा ?

मुंबई : पाच दिवसीय अर्थसंकल्पिय आधिवेशनाचा आज दुसरा दिवस होता. यावेळी राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प मांडला. या अर्थसंकल्पात पुढील चार महिन्यातील खर्चाची तरतूद करण्यात आली आहे.

अर्थसंकल्पातील महत्वाचे मुद्दे
1) राज्याची अर्थव्यवस्था 1 ट्रिलीयन डाॅलर अर्थव्यवस्था करण्यासाठी वाटचाल सुरु आहे. 2) 11 गडकिल्ल्यांना जागतिक पातळीवर जाण्यासाठी युनेस्कोला प्रस्ताव पाठवला आहे.3) जुन्नरमध्ये शिवसंग्रहालय उभारणार. 4) नवीन सुक्ष्म व लघु उद्योग धोरण लागू केले जाणार आहे. राज्यात 18 लघु उद्योग स्थापन करणार, डाओसमधील करारानुसार 3 लाखाहून अधिक उद्योग राज्यात येणार आहेत.⁠5) सात हजार किलोमीटर लांबीचे रस्ते सुरु करणार 6) सात हजार किलोमीटर लांबीचे रस्ते सुरु करणार 7) नगरविकासासाठी 10हजार कोटी रुपयांची तरतुद. सार्वजनिक बांधकामास 19 हजार कोटी राखीव ठेवण्यात आले आहेत. 8) वीज उपलब्ध नसलेल्या 37 हजार अंगणवाड्यांना सौरऊर्जा संच देण्यात येणार आहे.9) शेतकऱ्यांसाठी मागेल त्याला सौर कृषीपंप ही योजना सुरू करण्यात येणार आहे. यात 8 लाख 50 हजार नवे सौर कृषीपंप बसवण्यात येणार 10) केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्रातील रेल्वे मार्ग व प्रकल्पांसाठी 15,554 कोटींची तरतूद करण्यात आली आहे 11) महिलांसाठी 5,000 हजार पिंक रिक्षा उपलब्ध करून देणार 12) हर घर जल योजनेतून 1 कोटी नळ जोडण्यात येणार आहे 13) जालना यवतमाळ पुणे लोणावळा रेल्वे मार्गासाठी 50 टक्के रक्कम शासन देणार आहे.14) रत्नागिरी भागवत बंदरासाठी 300 कोटी 15) मिरकरवाडा बंदराचे नूतनीकरण करण्यात येत आहे 16) संभाजीनगर विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी आर्थिक तरतूद करण्यात येत आहे 17) वर्सोवा वांद्रे ते पालघर हा सागरी सेतू बांधण्यात येणार आहे 18) मिहान प्रकल्पासाठी 100 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे