मंत्री गिरीश महाजन म्हणतात.. माझा आकडा परफेक्ट असतो

मुंबई  : आगामी काळात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी  (Lok Sabha Elections) भाजपकडून जोरदार तयारी सुरू असून विरोधकांनी देखील इंडिया आघाडी स्थापन केली आहे. मात्र आता ना. गिरीश महाजन (Minister Girish Mahajan) यांनी महाराष्ट्रात (Maharashtra) ऑऊटऑफ जागा जिंकण्याचा दावा केला आहे.

गिरीश महाजन म्हणाले की, काँग्रेस किती लढतील आणि किती जिंकतील हे वेळच सांगेल. मी आधीच सांगितलं आम्ही ४८ जागा जिंकणार आहोत. मी सांगितलेला आकडा परफेक्ट असतो. माझ्या सांगण्यात चूक होत नाही. मी पुन्हा सांगेल की, आऊटऑफ ४८, एकही जागा आम्ही हारणार नाही.

काँग्रेस सांगते, आम्ही ३२ जागा जिंकेल. मात्र हा मोठा विनोद आहे. वास्तव बोललं पाहिजे. मी कधीही अवास्तव बोलत नाही, असंही महाजन यांनी नमूद केलं.