राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी ‘विशेष आषाढी रेल्वे’साठी घेतली रेल्वेमंत्र्यांची भेट

नवी दिल्ली  :  केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी भुसावळ-पुणे-भुसावळ रेल्वे सुरु करणे, “विशेष आषाढी रेल्वे” व रेल्वे स्टॉपेजसाठी केंद्रीय रेल्वे मंत्री आश्विनी वैष्णवजी यांची बुधवार, ३ जुलै रोजी भेट घेतली. यावर तत्काळ योग्य कार्यवाही करण्याचे आश्वासन रेल्वे मंत्री यांनी दिले आहे.

केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी खानदेशातील वारकऱ्यांंना पंढरपूरला जाण्यासाठी व भुसावळ पुणे भुसावळ रेल्वे सुरू करावी तसेच गाड्यांना थांबे देण्याची मागणी केली. भुसावळ स्थानकावरून पुण्यासाठी विशेष रेल्वे सुरू करावी.  रावेर लोकसभा क्षेत्रांतर्गत असणाऱ्या रेल्वे स्टेशनवर विविध एक्सप्रेस गाड्यांना थांबे देण्यात यावे.  भुसावळ-पुणे-भुसावळ नवीन रेल्वे सुरु करणे. रावेर लोकसभा क्षेत्रांतर्गत असणाऱ्या रेल्वे स्टेशनवर विविध एक्स्प्रेस गाड्यांना थांबा देणे आणि पूर्वी सुरु असलेल्या व कोविड कालावधीत थांबा रद्द केलेल्या गाड्यांना पुन्हा थांबा देणे या मागण्या केल्या.

जळगाव तसेच बुलढाणा जिल्ह्यातील अनेक नागरिक पुणे येथे स्थायिक आहेत. कामानिमित्त जाणाऱ्यांची संख्या सुद्धा खूप असल्याने भुसावळ-पुणे रेल्वे सुरु करणे बाबत प्रवाश्यांची अनेक दिवसापासून मागणी होती. यानुसार भुसावळ-पुणे-भुसावळ रेल्वे लवकर सुरु होणे, तसेच बोदवड स्टेशन येथे नवजीवन (12655/12656), सुरत-अमरावती (20925/20926), आजाद हिंद (12129/12130), नांदुरा स्टेशन येथे हैद्राबाद-जयपूर सुपरफास्ट (12719/12720), प्रेरणा एक्स्प्रेस (22137/22138), गरीबरथ (12113/12114), रावेर स्टेशन येथे महानगरी (22177/22178), निंभोरा स्टेशन येथे अमृतसर एक्सप्रेस (11057/11058), भुसावळ स्टेशन येथे राजधानी एक्सप्रेस टेक्नीकल हाल्ट (22221/22222) तर मलकापूर स्टेशन येथे अमरावती एक्स्प्रेस (22117/22118), गरीबरथ (12113/12114) आदी गाड्यांना थांबा देणे बाबततसेच आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर जाणाऱ्या भक्तांसाठी दरवर्षी प्रमाणे दि.16 जुलै जाण्यासाठी व दि.17 जुलै परत येण्यासाठी भुसावळ-पंढरपूर-भुसावळ अनआरक्षित मोफत “विशेष आषाढी रेल्वे” गाडी उपलब्ध करण्यासाठी आज बुधवार (दि.३) रोजी रेल्वे मंत्री आश्विनी वैष्णव यांची नवी दिल्ली येथे भेट घेऊन मागणी करण्यात आली आहे. यावर तत्काळ योग्य कार्यवाही करण्यात येण्याचे आश्वासन रेल्वे मंत्री यांनी दिले आहे.