मणिपूरवर पंतप्रधान मोदी म्हणाले, माझे हृदय वेदना आणि…

 तरुण भारत : मणिपूर गेल्या काही दिवसांपासून हिंसाचार चालू आहे आणि आता मणिपूर मध्ये  दोन महिलांवरती अत्याचार करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मणिपूरमधील दोन महिलांवर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेला लज्जास्पद असल्याचे म्हटले आहे. यासोबतच त्यांनी कठोर कारवाईचीही चर्चा केली आहे.

प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, कोणत्याही दोषीला सोडले जाणार नाही. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयानेही या प्रकरणाची स्वत:हून दखल घेतली आहे. असा सवाल त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारला केला आहे. पीएम मोदी म्हणाले, “मणिपूरमध्ये जी घटना समोर आली आहे ती कोणत्याही सुसंस्कृत समाजासाठी लाजिरवाणी घटना आहे. आणखी किती गुन्हेगार आहेत, ते त्यांच्या जागी आहेत पण संपूर्ण देशाचा अपमान होत आहे. मी सर्व मुख्यमंत्र्यांना त्यांच्या राज्यांतील कायदा आणि सुव्यवस्था अधिक बळकट करण्याचे आवाहन करतो.

मणिपूर घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर विरोधक सातत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधींपासून अनेक विरोधी नेत्यांनी या मुद्द्यावर पंतप्रधान मोदींकडे निवेदनाची मागणी केली होती. राहुल गांधी म्हणाले होते. ‘पंतप्रधानांच्या मौनाने आणि निष्क्रियतेने मणिपूरला अराजकतेकडे ढकलले आहे. मणिपूरमध्ये भारताच्या कल्पनेवर हल्ला होत असताना भारत गप्प बसणार नाही. आम्ही मणिपूरच्या लोकांच्या पाठीशी उभे आहोत. शांतता हाच पुढे जाण्याचा मार्ग आहे. दरम्यान मणिपूरमधून काल रात्री एक हृदय पिळवटून टाकणारा व्हिडिओ समोर आला आहे. शेकडो लोकांचा जमाव दोन महिलांना रस्त्यावर नग्नावस्थेत फिरायला लावताना दिसत आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ पाहून लोक संतप्त झाले असून प्रशासनाकडून कठोरात कठोर शिक्षा करण्याची मागणी होत आहे. या दोन्ही महिलांवर जवळच्या शेतात सामूहिक अत्याचार  झाल्याचा आरोप एका आदिवासी संघटनेने केला आहे.