Narendra Modi: भारताचा वेगवान विकास स्थिर सरकारमुळेच

गुजरात : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी एका जाहीर सभेला संबोधित केले. दीर्घकाळ स्थिर सरकार राहिल्याने एकापाठोपाठ एक निर्णय घेण्यात कशी मदत झाली, ज्याचा राज्याला फायदा झाला, हे गुजरातने अनुभवले आहे, असे मोदी म्हणाले. नरेंद्र मोदी पुढे बोलताना म्हणाले की,एखादा ठराव घेतला की तो पूर्ण करतो. देशात होत असलेल्या वेगवान विकासाचे मूळ आणि जगामध्ये भारताची  स्तुती होत आहे, ही जनतेची शक्ती आहे, ज्याने देशात स्थिर सरकार दिले आहे.

गुजरातमध्ये दीर्घकाळ स्थिर आणि बहुमताचे सरकार राहिल्याने आम्हाला एकापाठोपाठ एक निर्णय घेण्यात कशी मदत झाली, हे आम्ही अनुभवले आहे, असे मोदी ते पुढे बोलताना म्हणाले.लोकांना चांगले माहिती आहे की, मोठ्या विकास प्रकल्पांमागे घेतलेले धाडसी निर्णय आणि गुजरातचा झपाट्याने होणारा विकास हा गेल्या अनेक वर्षांमध्ये रचलेला मजबूत पाया आहे. आणि तुम्ही तुमच्या नरेंद्रभाईंना ओळखता, तुम्ही मला पंतप्रधान म्हणून न पाहता तुमचे नरेंद्रभाई म्हणून पाहता.  त्यांनी एकदा संकल्प घेतला की तो पूर्ण करतो.