---Advertisement---

जिल्ह्याच्या पूर्व भागात उत्तर-पूर्व मध्य रेल्वेला थांबे!, मोजकेच लोकप्रतिनिधी जनसुविधांसाठी आग्रही, प्रवाशांकडून संताप

---Advertisement---

जिल्ह्यात कोरोना संसर्गादरम्यान अनेक लहान-मोठे रेल्वे स्थानकांचे थांबे बंद करण्यात आले होते. ते थांबे पूर्ववत सुरू करण्यासह अन्य नवीन प्रवासी गाड्यांसाठी थांबे देण्यात यावेत. या मागणीसाठी नगण्य लोकप्रतिनिधी जनसुविधांसाठी आग्रही असून अन्य लोकप्रतिनिधींना जनसुविधांचे कोणतेही सोयरसुतक नसून आपल्याच कामात मग्न असल्याचे दिसून येत आहेत.

दोन-तीन दिवसांपूर्वीच केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी रेत्वे बोर्ड चेअरमन सतीश कुमार यांची भेट घेतली. दरम्यान रावेर लोकसभाअंतर्गत रावेर, बोदवड, वरणगाव, निंभोरा, मलकापूर आदी रेत्वे स्थानकांवर नव्याने सुरू झालेल्या तसेच थांबे नसलेल्या गाड्यांना थांबे वाढवण्यावर चर्चा करण्यात आली.

जिल्ह्यात कोरोना संसर्गकाळापूर्वी जळगाव जंक्शन स्थानकावर मध्य आणि पश्चिम लोहमार्गावर दिवसभरात पूर्वी ८० ते ८५ प्रवासी गाड्या होत्या. या गाड्यांच्या माध्यमातून चाळीसगाव ते जळगाव भुसावळ तसेच रावेर व बोदवड मलकापूर दरम्यान हजारो प्रवासी, नोकरदार, शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थी ये-जा करीत होते.

परंतु लॉकडाऊननंतर बहुतांश गाड्यांच्या वेळासुद्धा बदलविण्यात येऊन अनेक थांबे कमी करण्यात आले होते. तसेच आधुनिक संरचनेनुसार बोग्यादेखील बदलविण्यात आल्या. तर नंदुरबार, भुसावळ आणि सुरत-भुसावळ पैसेंजर, एक्सप्रेस वगळता सर्वच गाड्यांच्या बोग्या कमी करण्यात आल्या आहेत.

लॉकडाऊन नंतर बऱ्याचशा मेल, एक्सप्रेस गाड्यांच्या वेळा बदलण्यात आल्या आहेत. यात महाराष्ट्र एक्सप्रेस पूर्वी सकाळी ७वाजेला चाळीसगाव, ७.२५ वाजता पाचोरा तसेच ८ वाजता जळगाव आणि ८.२० वाजता भुसावळ येथे तर देवळालीवरून सकाळी ५ वाजता सुटणारी भुसावळ शटल चाळीसगाव येथे ७.४५, पाचोरा ८.२५ आणि जळगावला ९. तर भुसावळला ९.३० वाजता येत होती.
जळगाव शहर शैक्षणिक हब असून कला, वाणिज्य व विज्ञान तसेच अभियांत्रिकी, वैद्यकीय, फार्मसी, कृषी तसेच अन्य विविध पदवी, पदव्युत्तर शिक्षणासाठी नूतन मराठा, मूळजी जेठा तसेच अन्य शाळा, महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांना सकाळी महाराष्ट्र तसेच देवळाली या दोन्ही गाड्यांच्या माध्यमातून सकाळच्या वेळी ७ ते ८ वाजेदरम्यान तासिका सुरू होणाऱ्या महावि‌द्यालयांत पोहचणे शक्य होते.

तसेच ९ ते १० वाजेदरम्यान जिल्हा न्यायालय, जिल्हाधिकारी कार्यालय, कृषी विभाग, पंचायत समिती, जिल्हा परिषदेसह अन्य विविध शासकीय, निमशासकीय कार्यालयांसह अन्य खासगी नोकरदार वा औद्योगिक कामगार, कर्मचाऱ्यांसाठी सोयीच्या होत्या. कोरोनानंतर देवळाली पहाटे ५ ऐवजी दोन तास उशिराने ७ वाजेला सोडण्यात येत आहे. देवळाली मेमू दुपारी १२ वाजेनंतरच जळगाव येथे येत असल्याने कोणत्याच शाळा, महाविद्यालयीन वा शासकीय नोकरदारांसाठी उपयोगाची नाही. यासारखीच पश्चिम लोहमार्गावरदेखील सुरत-भुसावळची पहाटेची वेळ गैरसोयीची आहे.

माजी खासदार ए. टी. पाटील यांनी महानगरी, पवन एक्सप्रेससह अन्य गाड्यांना थांबे मंजूर केले होते, तर पुणे-भुसावळ दरम्यान हुतात्मा
एक्सप्रेस सुरू केली होती. परंतु कोरोनानंतर अनेक मेल एक्सा गाड्यांचे बंद केलेले थांबे सुरू करण्यात यावेत, गेल्या वर्ष-दीड वर्षात अनेक लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्या सुरू झाल्या आहेत. त्या गाड्यांसह अन्य गाड्यांना जळगाव व भुसावळ ते नाशिक रोड दरम्यान कोणत्याही स्थानकावर थांबा नाही. यात महाराष्ट्र, अमृतसर, कुशीनगर वा शालीमार एक्सप्रेसची वेळ पूर्वीप्रमाणे करावी, बोग्यांची संख्या वाढवावी, जुने थांबे पूर्ववत सुरू करावेत. यासाठी केवळ रावेरच्या खासदार रक्षा खडसे यांनीच पुढाकार घेतला असून अन्य लोकप्रतिनिधी मात्र त्यांच्या मतदारसंघातच मग्न असून मध्य रेल्वे मार्गावर प्रवासी गाड्यांना थांबे वा नवीन गाड्यांना थांबे देण्यासह प्रवासी समस्यांविषयी जागरूक नसल्याचेच दिसून येत आहे.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment