---Advertisement---
‘ऑपरेशन सिंदूर’ हे दहशतवादाविरोधातील आमची नवी नीती आहे. भारताने संघर्ष थांबविण्यासाठी आमच्याकडे विनंती केली आहे. यापुढे दहशतवादी आणि लष्करी कारवाया केल्या जाणार नसल्याचे पाकिस्तानने याचना करताना सांगितले. पाकिस्तान भविष्यात कसा वागतो हे पाहिल्या जाईल. त्यामुळे आम्ही केवळ सध्या ऑपरेशन सिंदूर फक्त स्थगित केली आहे. पाकिस्तान सोबत यापुढे केवळ दहशतवाद आणि व्याप्त काश्मीरच चर्चा केली जाईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला ठणकावून सांगितले. मोदी यांनी सोमवारी रात्री आठ वाजता देशाला संबोधित करताना पाकिस्तानला स्पष्ट शब्दात सुनावले.
२२ एप्रिल रोजीचा पहलगाम हल्ला, ७ते १० मे पर्यंत झालेल्या भारत-पाकिस्तान संघर्षावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रथमच सार्वजनिक भूमिका मांडली. भाषणाच्या प्रारंभीच पंतप्रधानांनी तिन्ही सेनादल, निमलष्करी दल आणि नागरिकांचे आभार मानले. मोर्दीचे आजचे भाषण म्हणजे पाकिस्तानबाबतची भविष्यातील भूमिका आणि रणनीती मानल्या जात आहे. दहशतवाद आणि लष्करी कारवायांबाबत स्पष्ट शब्दात पाकिस्तानला सुनावले आहे.
आमच्या भगिनींच्या कुंकवाला हात घालाल तर त्याचे किती भयंकर परिणाम होतात हे दहशतवादी आणि पाकिस्तानने अनुभवले आहे. पहलगाम येथे निष्पाप पर्यटकांवर हल्ला केल्यानंतर याचा बदला घेण्याची आणि दहशतवाद्यांना न भूतो न भविष्यती धडा शिकविण्याचा निर्णय भारताने घेतला आणि त्याची अमलबजावणी केल्याचे जगाने ७ मे च्या रात्री पाहिले. दहशतवाद्यांनी स्वप्नातही विचारही केला नसेल की भारत एवढा मोठा निर्णय घेईल. पण जेव्हा देश एकजूट असतो तेव्हा असे मोठे आणि पोलादी निर्णय घेतले जातात. ऑपरेशन सिंदूर राबवून भारताने भारताने दहशतवादी अड्यांवर ड्रोन्स आणि क्षेपणास्त्रांनी हल्ले करून ते नष्ट केले. बहावलपूर, मुदिरके ही दहशतवादाची केंद्र जी आम्ही जमीनदोस्त केली, असे पंतप्रधान म्हणाले.
भारताच्या कारवाईमुळे पाकिस्तान बिथरला आणि दहशतावादी कारवायांना पाठींबा देण्याऐवजी भारतावर हल्ला केला. त्याने मंदिर, मशिदी आणि नागरिकांच्या घरांवर हल्ले केले. पण, यामध्येही पाकिस्तान उघडा पडला. जगाने पाहिले की भारताने पाकिस्तानचे ड्रोन्स आणि क्षेपणास्त्र हवेतच हवेत नष्ट केले. भारताचे ड्रोन्स आणि क्षेपणास्त्रांनी भयंकर हल्ले केले. पहिल्या तीन दिवसांमध्येच पाकिस्तानला एवढे बर्बाद केले की तो आपली कातडी वाचण्यासाठी रस्ते शोधू लागला. भारताची कारवाई पाहून याचना करू लागला. घाबरलेल्या पाकिस्तानच्या डीजीएमओनी १० तारखेला भारताला फोन केला. पण तोपर्यंत आम्ही दहशतवादी अड्डे नष्ट केले. यापुढे दहशतवादी कारवाया आणि सैन्य कारवाई करणार नसल्याचे सांगितले. पावर आम्ही विचार केला, असे पंतप्रधान म्हणाले.
शांततेसाठी शक्तिशाली असणे आवश्यक
आज बुद्ध पौर्णिमा आहे. भगवान गौतम बुद्ध यांनी शांतीचा मार्ग दाखविला, पण शांतता ही शक्तीच्या मार्गातून जाते. परिणामी नागरिकांना शांततेत जीवन जगायचे असेल तर भारत शक्तीशाली असणे आवश्यक आहे. असे म्हणत पंतप्रधानांनी पुन्हा एकदा भारतीय सेना, सशस्त्र दलांना आणि भारतीय नागरिकांना वंदन केले आणि आभार मानले.
दहशतवाद आणि चर्चा, हे चालणार नाही
भारत पाकिस्तानच्या धमक्यांना भीक घालणार नाही. आम्ही जगाला सांगू इच्छितो की, पापुढे पाकिस्तानसोबत चर्चा होईल ती दहशतवाद आणि व्याप्त काश्मीरवरच. त्यामुळे दहशतवाद सुरू असताना चर्चा आणि व्यापार होणार नाही. पाणी आणि रक्त एकत्रपणे वाहणार नाही. यापुढे आम्ही आमच्या अटींवर चर्चा करू. कारण, आता दहशतवादाविरोधात झिरो टॉलरन्स हे आमचे धोरण आहे.
आमची सेना अजूनही सज्ज
पाकिस्तानच्या विनंतीवर आम्ही विचार करून ऑपरेशन थांबविले. पण, मी स्पष्ट करू इच्छितो की आम्ही ऑपरेशन सिंदूर थांबविले नाही तर फक्त स्थगित केले आहे. आमची सेना सज्ज आहे. काही आगळीक केल्यास पुन्हा हल्ला चढवू, अशा इशारा पाकिस्तानला दिला आहे.
दहशतवादाच्या हृदयावरच घाव
जगात अनेक वेळा दहशतवादी हल्ले झाले. या सवचि तार पाकिस्तानातील केंद्राशी जुळलेले आढळले. त्यामुळी भारताने ही केंद्रच उडविली. या हल्ल्यात भारताने १०० पेक्षा जास्त दहशतवाद्यांना ठार केले. गेल्या तीन दशकांपासून पाकिस्ताना खुलेआम फिरणाऱ्या दहशतवाद्यांना एका झटक्यात खल्लास केले. आम्ही पाकिस्तानच्या हृदयावरच धाव घातल्याचे मोदी म्हणाले.
आण्विक ब्लॅकमेल करणे खपवून घेणार नाही
यापुढे अण्वस्त्रांची भीती घालणे चालणार नाही. अणुबॉम्बची धमकी देऊन दहशतवाद्यांना आश्रय देणे मुळीच खपवून घेणार नाही. भारताच्या हल्ल्यात जेव्हा दहशतवादी मारले गेले त्या दहशतवाद्यांच्या अन्त्ययात्रेत पाकिस्तानचे वरिष्ठ लष्करी अधिकारी उपस्थित होते. त्यामुळे पाकिस्तानचा खरा चेहरा जगाने पाहिला. यापुढे हे खपवून घेतले जाणार नाही. असे मोदी म्हणाले.