मतदार यादीतील हरकतींनी ओलांडला आठ हजारांचा टप्पा, आज अंतीम मुदत; प्रशासनासमोर आव्हान

---Advertisement---

 

जळगाव : सार्वत्रिक महापालिकेने निवडणुकीसाठी जाहीर केलेल्या प्रारूप मतदार यादीत मोठ्या प्रमाणात गोंधळ व त्रुटी असल्याने गेल्या सात दिवसापासून मनपा प्रशासनाकडे हरकती व तक्रारींचा पाऊस पडत आहे. बुधवार पर्यंत ८ हजार ५०७ अर्ज मनपास प्राप्त झाले असून गुरुवार २८ रोजी हरकती व तक्रारी घेण्याचा शेवटचा दिवस असून शेवटच्या दिवशी देखील मोठ्या संख्येने अर्ज मनपाकडे येतील असा अंदाज वर्तवला जात असून १० हजाराच्यावर ही संख्या जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मतदार याद्यांवर गेल्या सात दिवसांपासून मतदार व इच्छुक व उमेदवारांकडून हरकती तक्रारी स्वीकारल्या जात आहेत. बुधवार (२६ नोव्हेंबर) रोजी देखील तब्बल २ हजार ४३६ हरकती व तक्रारी नोंदविण्यात आल्या. त्यामुळे आलेल्या सर्व हरकती व अर्जावर आठ दिवसात महापालिकेने नेमणूक केलेल्या ५० कर्मचाऱ्यांना दहा हजारापेक्षा अधिक मतदार यादीवरील हरकती व तक्रारींचा निपटारा करावा लागणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना चांगलीच तारेवरची कसरत करावी लागणार आहे.

८ डिसेंबरला मतदान केंद्रावर यादी होणार प्रसिद्ध

महापालिकेच्या १९ प्रभागांसाठी प्रभागनिहाय मतदार यादी जाहीर करून हरकती व सूचना २० ते २७ नोव्हेंबर पर्यंत स्विकारली जाणार आहे. तर ५ डिसेंबर मतदार यादीवर दाखल केलेल्या हरकती व तक्रारी वर निर्णय घेऊन प्रभाग निहाय मतदार यादी प्रसिद्ध करावी लागणार आहे. त्यानंतर ८ डिसेंबरला मतदान केंद्राच्या ठिकाणी यादी प्रसिद्ध करणे व १२ डिसेंबरला मतदान केंद्रनिहाय यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---