---Advertisement---
काँग्रेस मागील काही दिवसांपासून ईव्हीएम मशीनबाबत वेगवेगळे दावे करत आहे. खासदार राहुल गांधींनीही यावरून निवडणूक आयोगावर आरोप केले आहे. ईव्हीएम मशीनबाबत कर्नाटक सरकारने एक अधिकृत सर्व्हे केला आहे. या सर्व्हेमध्ये ईव्हीएम वरील प्रश्नाला नवीन वळण दिले आहे.
सर्व्हेक्षणानुसार, कर्नाटकातील जनतेचा एक मोठा वर्ग ईव्हीएम सुरक्षित आणि अचूक मानतो. या निकालांनंतर, राहुल गांधी यांच्या मत चोरीच्या आरोपांवरून भाजपाने काँग्रेसवर टीका केली. कर्नाटकचे मुख्य निवडणूक अधिकारी (सीईओ) व्ही. अंबुकुमार यांच्यामार्फत हे सर्वे क्षण करण्यात आले. यामध्ये १०२ विधानसभा मतदारसंघांमधील ५,१०० लोकांची मते घेण्यात आली.
या सर्व्हेमध्ये सहभागी झालेल्या एकूण ८३.६१ टक्के लोकांनी ईव्हीएम विश्वसनीय असल्याचे सांगितले. ईव्हीएम अचूक निकाल देतात यावर ६९.३९ टक्के लोकांनी सहमती दर्शवली, तर १४.२२ टक्के लोकांनी यावर पूर्ण सहमती व्ये केली. लेक कलबुर्गीमध्ये ईव्हीएमवर सर्वाधिक विश्वास दिसून आला, तिथे ९४.४८ टक्के लोक मतदान यंत्राच्या बाजूने होते. म्हैसूरमध्ये ८८.५९ टक्के लोकांनी त्याच्या विश्वासार्हतेला मान्यता दिली. बेंगळुरूमध्ये ६३.६७ टक्के लोकांनीही यावर सहमती दर्शविली.
काँग्रेस नेते राहुल गांधी गेल्या काही काळापासून ईव्हीएमच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थत करत आहेत. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीदरम्यानही त्यांनी ‘ब्लॅक बॉक्स’ आणि ‘व्होट चोरी’ सारखे शब्द वापरून निवडणूक आयोगाच्या कामकाजावर टीका केली. या सर्वे क्षणामुळे काँग्रेसच्या दाव्यावरच प्रश्न उपस्थित झाले आहेत.









