---Advertisement---
चोपडा : तालुक्यातील आडगाव उपविभागात महावितरणची अवकृपा जाणवत आहे. महावितरणने सलग अठरा तास वीज प्रवाह बंद ठेवल्याने ग्राहक हैराण झाले आहेत. महावितरणच्या कारभारात गलथानपणा दिसून येत आहे. बिल भरणारे व वीज चोरी करणारे तसेच वीज बिल न, भरणारे या सर्वांना सामान न्यायाने महावितरण सेवा पुरवित असते. याचा फटका मात्र सर्वसामान्य ग्राहकांना बसत असून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची दखल घ्यावी अशी मागणी होत आहे.
महावितरणच्या अभियंता , उप विभागीय अभियंता, यांच्या वर्षानुवर्ष न झालेल्या बदल्या, कर्मचाऱ्यांची वाणवा, तातडीने कामे न करणारी यंत्रणा येथे कार्यरत आहे. सोशिक ग्राहकांच्या माध्यमातून आपले कोण वाकडे करून घेणार आहे? अशा भ्रमात राहणारे अनेक अभियंते, लाईनमन, वायरमन, वर्षानुवर्षेपासून एकाच पदावर एकाच ठिकाणी नेमणुकीला असतात.
---Advertisement---
तीन वर्षानंतर बदलीचा नियम या कर्मचाऱ्यांना लागू होत नाही की काय ? असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. आडगाव उपविभागात नारोद,खर ग, आंबाडे ही गावे येतात. येथील परिस्थिती ही तशीच त्यामुळे उन्हाळ्यात असो वा पावसाळा हिवाळ्यात विजेच्या लपंडाव कायम या भागात सुरू असतो. मानवी जीवन इतके विजेवर अवलंबून आहे की, ती आता चौथी गरज बनली आहे.
अशा परिस्थितीत ग्रामीण भागात, पिठाच्या गिरण्या, गुरांना पिण्याचे पाणी, पाणीपुरवठा योजना, घरगुती उपकरणे दिवाबत्ती या सर्व यंत्रणा विज गुलझाल्याबरोबर बंद पडतात. लाईनमन ,अभियंता, ही मंडळी शहरात आलिशान वस्तीत राहते. ग्रामीण भागात एखाद दुसरा वायरमन, आणि रोजंदारीवर काम करणारे झिरो वायरमन एवढेच काय ते राहतात. त्यांच्या माध्यमातून विजेचे एवढे मोठे नेटवर्क सुरू असते. यात बिघाड झाला म्हणजे वेळेवर कामे होत नाहीत.
शनिवारी ( 14 जून) रोजी दुपारी तीन वाजता वादळ वाऱ्यामुळे खंडित झालेला वीज प्रवाहामुळे रात्र ग्रामस्थांना अंधारात काढावी लागली. दुसऱ्या दिवशी रविवारी (१५ जून) रोजी दहा वाजेपर्यंत देखील वीज प्रवाह सुरळीत न झाल्याने ग्रामस्थांना अठरा तास वीज विना काढावे लागले. विजेशिवाय ग्रामस्थांचे अतोनात हाल होत असून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याचे कडे लक्ष द्यावे अशी मागणी आडगाव ग्रामस्थांनी केली आहे.
बेजबाबदार उत्तरे
132 केवी पावर स्टेशन वरून संपूर्ण तालुक्यात वीज पुरवठा होतो, वादळ वाऱ्यामुळे विज गेली तर? ग्राहक समजून घेतात. परंतु ऑपरेटर कर्मचारी बेजबाबदार उत्तर देण्यात माहीरआहेत? येईल, येईल, होईल ,पाहू? अशी जबाबदार उत्तरे देऊन फोन कट करतात. बेजबाबदार कर्मचाऱ्यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी समज द्यावी अशी मागणी होत आहे.