Ratan Tata Love Story: रतन टाटा 4 वेळा प्रेमात, तरीही का नाही चढले बोहल्यावर ? जाणून घ्या !

मुंबई : देशातील उद्योगपतीत रतन टाटा यांनी वयाच्या 86 व्या वर्षी वयाच्या मुंबईत अखेरचा श्वास घेतला. सोमवारी त्यांना आरोग्य तपासणीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.  मोठे उद्योगपती असण्यासोबतच ते एक महान समाजसेवक आणि देशभक्त देखील होते. रतन टाटा आयुष्यभर अविवाहित राहिले. मात्र, ते आयुष्यात चार वेळा प्रेमात पडले. स्वतः रतन टाटा यांनी एका मुलाखतीदरम्यान त्यांच्या लव्ह लाईफबद्दल खुलासा केला होता.

लव्ह लाईफबद्दल केला होता खुलासा
रतन टाटा यांच्या आयुष्यात एकदा नाही तर चार वेळा प्रेमाने दार ठोठावले होते, पण कठीण प्रसंग असूनही त्यांचे नाते लग्नापर्यंत पोहोचू शकले नाही, असे ते म्हणाले होते. यानंतर त्यांनी पुन्हा लग्नाचा विचार केला नाही. त्यांचे संपूर्ण लक्ष टाटा समूहाला भारतात पुढे नेण्यावर होते.

चार वेळा प्रेम केले, तरीही अविवाहित राहिले
 रतन टाटा यांनी त्यांच्या मुलाखतीत  पुढे सांगितले होते की,  लग्न न करण्याचा निर्णय त्याच्यासाठी योग्य ठरला, कारण त्यांनी लग्न केले असते तर परिस्थिती खूपच गुंतागुंतीची झाली असती. ते  म्हणाले होते, मी तुम्हाला सांगेन की मी चार वेळा लग्न करण्याबाबत गंभीर झालो आणि प्रत्येक वेळी कोणत्या ना कोणत्या भीतीने मी मागे हटलो. मी जेव्हा अमेरिकेत काम करत होतो, तेव्हा मी कदाचित प्रेमाबाबत सर्वात गंभीर झालो होतो आणि मी भारतात परत आल्यामुळेच आम्ही लग्न करू शकलो नाही.’ रतन टाटा यांच्या मैत्रिणीला भारतात यायचे नव्हते. दुसरे म्हणजे, त्याच वेळी भारत-चीन युद्धही सुरू होते. शेवटी त्यांच्या  मैत्रिणीने अमेरिकेतच दुसऱ्याशी लग्न केले.

मीडिया रिपोर्ट्समध्ये असाही दावा करण्यात आला आहे की, रतन टाटा एकेकाळी अभिनेत्री सिमी ग्रेवालच्या जवळ आले होते. एका मुलाखतीत सिमीने रतन टाटा बद्दल सांगितले होते, ‘ते एक परिपूर्ण गृहस्थ आहेत. त्याची विनोदबुद्धी खूप चांगली आहे आणि ते खूप नम्र आहे.