राजकीय अधिष्ठानापेक्षा धार्मिक अधिष्ठान हे महत्त्वाचे : पालकमंत्री गुलाबराव पाटील

पाळधी  :  पंढरपूरची आषाढीला पांडुरंगाच्या दर्शनासाठी 4 हजारापेक्षा भाविक भक्तांना दर्शनाला पाठविता आल्याचे  भाग्य माझ्यासारख्या कार्यकर्त्याला लाभले. पांडुरंगाच्या कृपेने आणि वारकऱ्यांच्या आशीर्वादाने आगामी काळात आम्ही काम करत राहणार असून संत कार्यासाठी सदैव झटत राहणार असून  ‘राजकीय अधिष्ठानापेक्षा धार्मिक अधिष्ठान’ हे महत्त्वाचे असते असे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.

श्रीगुरु मोठे बाबा वारकरी सेवा टस्ट्र आयोजित पाळधी येथील सुगोकी लॉन्सवर आयोजित भजनी मंडळ साहित्य वाटप कार्यक्रमप्रसंगी पालकमंत्री गुलाबराव  पाटील बोलत होते. कार्यक्रमाचे नियोजन जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव  पाटील व मित्र परिवाराने केले होते. या अत्यंत शिस्तबद्ध व अनोख्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते धरणगाव व जळगाव तालुक्यातील  79 भजनी मंडळांना आज साहित्याचे वाटप करण्यात आले.

पालकमंत्री गुलाबराव पाटील पुढे म्हणाले की, वारकरी संप्रदायाने सनातन संस्कृती टिकवली असून गावा – गावात संप्रदाय वाढवाला आहे. मात्र, ग्रामीण भागात वारकरी साहित्याची उणिव भासत असल्याने सांस्कृतिक व धार्मिक परंपरा टिकून ठेवण्यासाठी भजनी साहित्य वाटप केले जात आहे. जिल्हास्तरीय वारकरी भवन उभारण्याचा मानस पूर्ण होत असल्याने त्याचा मनस्वी आनंद असल्याचे सांगितले. वारकरी संप्रदाय वाढीसाठी व जनसामान्याच्या कार्यासाठी नेहमीच कटिब्ध्द राहील, अशी ग्वाही पालकमंत्री  गुलाबराव पाटील यांनी दिली.

आतापर्यंत तीन टप्यात 177 भजनी साहित्य वाटप !

ग्रामीण भागात भजन, किर्तन, हरिनामाचा सप्ताह असे विविध कार्यक्रमाच्या माऊलींच्या हरिनामाचा गजरासाठी भजनी मंडळ साहित्याची खूप गरज असते हिच गरज ओळखुन पालकमंत्री गुलाबराव पाटील व जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांनी जळगाव ग्रामीण मतदार संघातील जळगाव व धरणगाव तालुक्यातील पहिल्या टप्प्यात 57, दुसऱ्या टप्प्यात 41 आणि आज तिसऱ्या टप्प्यात 79 असे एकूण 177 गावांना भजनी साहित्य वाटप करण्यात आले.

याप्रसंगी ह.भ.प. गजानन महाराज यांनी तळागाळात वारकरी संप्रदाय रुजविण्याचे  काम वारकरी करीत असतो. गुलाबभाऊंच्या  माध्यमातून खान्देशाला उज्जवल नेतृत्व लाभले आहे. या साहित्याच्या माध्यमातून प्रत्येक गावात टाळ, मृदृगाचा आवाजाचे पुण्य गुलाबभाऊंना  लाभत असून  पालकमंत्री गुलाब भाऊ  म्हणजे   राजकारणात परमार्थ रुजविणारे नेतृत्व  असल्याचे प्रतिपादन श्रीगुरु मोठे बाबा वारकरी सेवा टस्ट्रचे अध्यक्ष तथा गौप्रेमी  ह.भ.प.गजानन महाराज यांनी सांगितले.

प्रस्ताविक जि.प.माजी सदस्य प्रतापराव पाटील यांनी केले. सूत्रसंचालन ह.भ.प. प्रा.सी. एस. पाटील यांनी केले. आभार सुशील महाराज विटनेरकर यांनी मानले.

यांची होती उपस्थिती

याप्रसंगी , ह.भ.प. चतुर्भुज महाराज धरणगावकर, ह.भ.प. पांडुरंग महाराज आवरकर ह.भ.प. शाम महाराज शास्त्री पिंपळगावकर, ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज पाळधीकर, ह.भ.प. सुशील महाराज विटनेरकर,  ह.भ.प. समाधान महाराज भोजेकर, कैलास महाराज चोपडाईकर, ह. भ.प. बाबा हंस महाराज, जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, पवन सोनवणे, जिल्हा प्रमुख निलेश पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुख संजय पाटील सर, उपजिल्हाप्रमुख अनिल भोळे, नरेंद्र सोनवणे , शाळेचे चेरमन विक्रम पाटील, तालुका प्रमुख डी. ओ. पाटील, अर्जुन पाटील, शिवराज पाटील , राजेंद्र चव्हाण, दिलीप आगीवाल, मा. सभापती प्रेमराज पाटील, अनिल पाटील, रविंद्र चव्हाण सर, सचिन पवार, कैलास पाटील भरत बोरसे, दुध संघाचे रमेश आप्पा पाटील, जितू पाटील, राजू पाटील, स्वप्नील परदेशी, भानुदास विसावे,  परिसरातील सरपंच तालुक्यातील सर्व  पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व सरपंच , वारकरी संप्रदायाचे भजनी मंडळी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.