---Advertisement---
New Chief Justice Of India : सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी त्यांचा उत्तराधिकारी म्हणून न्यायमूर्ती संजीव खन्ना यांचे नाव केंद्र सरकारकडे पाठवले आहे.सध्याचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड 10 नोव्हेंबरला निवृत्त होत आहेत. यानंतर न्यायमूर्ती संजीव खन्ना हे देशाचे 51 वे सरन्यायाधीश असतील.
डीवाय चंद्रचूड यांनी न्यायमूर्ती संजीव खन्ना यांचा उत्तराधिकारी म्हणून औपचारिकपणे प्रस्तावित केले आहे. सरकारने मान्यता दिल्यास न्यायमूर्ती खन्ना हे भारताचे 51 वे सरन्यायाधीश होतील. न्यायमूर्ती संजीव खन्ना 11 नोव्हेंबरला सरन्यायाधीशपदाची शपथ घेऊ शकतात. त्यांचा कार्यकाळ सुमारे सहा महिन्यांचा असेल, जो 13 मे 2025 रोजी संपेल. त्यानंतर ते निवृत्त होणार होतील.
केंद्र सरकारने मागितले होते नाव
12 ऑक्टोबर रोजी केंद्र सरकारने CJI चंद्रचूड यांना पत्र पाठवून त्यांच्या उत्तराधिकाऱ्याचे नाव देण्याची विनंती केली होती.डीवाय चंद्रचूड यांनी न्यायमूर्ती संजीव खन्ना यांचा उत्तराधिकारी म्हणून खन्ना यांच्या नावाचे पत्र केंद्र सरकारला दिले आहे. यानंतर CJI चंद्रचूड यांनी बुधवारी सकाळी न्यायमूर्ती खन्ना यांना पत्राची प्रत दिली. न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी 9 नोव्हेंबर 2022 रोजी CJI म्हणून पदभार स्वीकारला होता. 10 नोव्हेंबरला या पदावरून पायउतार होणार आहे.
काय आहे परंपरा ?
परंपरेनुसार, कायदा मंत्रालय सरन्यायाधीशांना त्यांच्या निवृत्तीच्या सुमारे एक महिना आधी पत्र लिहून त्यांच्या उत्तराधिकाऱ्यांच्या नावाची मागणी करते. यानंतर, विद्यमान न्यायाधीश मंत्रालयाला पत्र लिहून त्यांची शिफारस पाठवतात. विद्यमान सरन्यायाधीशांच्या शिफारशीनंतर, सरकार लवकरच 11 नोव्हेंबरपासून न्यायमूर्ती खन्ना यांची पुढील सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती करणारी अधिसूचना जाहीर करतील.
न्यायमूर्ती खन्ना यांची विपुल अनुभव असलेली एक कारकीर्द आहे आणि त्यांनी भारताच्या न्यायिक परिदृश्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. न्यायमूर्ती खन्ना यांची 2005 मध्ये दिल्ली उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून पदोन्नती करण्यात आली आणि 2006 पर्यंत ते कायम न्यायाधीश बनले. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी दिल्ली न्यायिक अकादमी, दिल्ली आंतरराष्ट्रीय लवाद केंद्र आणि जिल्हा न्यायालय मध्यस्थी केंद्रांमध्येही योगदान दिले.
---Advertisement---