Assembly Elections : अमोल मिटकरी यांना शिवसेनेचे प्रत्युत्तर

लोकसभा निवडणुकीनंतर आता राज्यात महत्वपूर्ण अशी विधानसभेच्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. राजकीय वर्तुळात विधानसभा निवडणुकीत कोणता पक्ष किती जागा लढवेल याची चाचपणी सुरु झाली आहे. यात महायुती व महाविकास आघाडीच्या अंतर्गत राजकीय पक्ष एकवटले आहेत. यातच राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्याने विधानसभा निवडणूकसंदर्भांत महत्वपूर्ण विधान केले आहे.प्रत्येकाला जर 100 जागा हव्या असतील तर स्वबळावरच लढावं लागेल असे सूचक वक्तव्य अमोल मिटकरी यांनी केले आहे.

अमोल मिटकरी म्हणले की, मला असं वाटतं की राष्ट्रवादीने केवळ 100 जागा लढवाव्यात असं ताणून धरलं तर वेगळंच लढावं लागेल. 55 जागा आम्हाला महायुतीत भेटत असतील. तर त्यात आम्ही समाधानी असू असं नाही. महायुती आणि मविआ म्हणतात आम्ही 100 100 जागा लढू 288 मतदारसंघ आहेत.

महायुतीत राष्ट्रवादीने प्रवक्त्याला आवर घालावं, असं वाटत असेल तर शिवसेना किंवा भाजपाने देखील त्या त्या पक्षाने लगाम घालावा. चंद्रकांत पाटील आणि माझा फोनवर चर्चा झाली. यात त्यांना मी त्यांना उत्तर मागितलं की तुमच्या वेळी छुपा राजाश्रय होता का? मग त्यांनी मला फोनवर सविस्तर सांगितलं आणि महायुतीमध्ये विसंवाद नको. आपण तिन्ही एकत्र असावा, असं सांगितल्याचं अमोल मिटकरी म्हणालेत.

मंत्री शंभूराजे देसाई यांनी महायुतीमध्ये अमोल मिटकरी यांनी पक्षश्रेठींना विचारुन बोललं पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली. ते पुढे म्हणाले की, जागा वाटपाची चर्चा ही माध्यमांसमोर करायची नसते. तिन्ही पक्षांचे प्रमुख आणि रामदास आठवले, महादेव जानकर बसून ठरवतील. अशी वक्तव्य करुन विनाकारण महायुती मध्ये गैरसमज निर्माण होतात. गैरसमज निर्माण होइल असं वक्तव्य कोणी करु नयेत असेही ते म्हणाले.