---Advertisement---

एकतरी पुढारी दाखवून द्या, ज्यांनी योजना आणून लाभ दिला, आमदार डॉ. गावित यांनी घेतला विरोधकांचा खरपूस समाचार

---Advertisement---

लाभार्थीना गृहोपयोगी वस्तूंचे वाटप शांततेत सुरू असताना कोणीतरी लोकप्रतिनिधींनी येऊन त्यांचे माथे भडकावणे चूक आहे. आम्ही लोकांसाठी ज्या ज्या वेळी योजना आणल्या, त्या त्या वेळी त्या बंद पाडण्याचा प्रयत्न केला. अशा लोकांना दखल घेण्याचा अधिकार नाही. योजना शासनाच्याच असतात, हे खरे आहे; परंतु त्या लोकांपर्यंत देण्याची नैतिकता नेत्यांमध्ये असावी लागते.

जिल्ह्यामध्ये असा एक पुढारी दाखवून द्या, ज्याने नवीन काही योजना आणली आहे आणि लोकांना लाभ दिला आहे. अशा शब्दांत माजी मंत्री तथा आमदार डॉ. विजयकुमार गावित यांनी विरोधकांना फटकारले, कामगार कल्याण महामंडळातर्फे गृहोपयोगी वस्तूंचे अर्थात भांडी सेचाचे वाटप सध्या सुरू असून, ते संव घेण्यासाठी रोज रांगेत शेकडो लाभार्थी उभे राहत आहेत. हे वाटप सुरू असलेल्या ठिकाणी मंगळवारी (२७ मे) शेकडो लाभार्थीनी गर्दी केली होती.

आमदार डॉ. गावित आणि जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित यांच्या प्रमुख हस्ते भांडी वाटप करण्यात आले, त्या वेळी शेखर पाटील, प्रवीण पाटील व अन्य प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान, डॉ. गावित यांच्याविरोधातील एका लोकप्रतिनिधीने वाटपाच्या ठिकाणी उपस्थित राहून लाभार्थीना भडकावण्याचा प्रयत्न केला. त्याचा संदर्भ घेऊन डॉ. गावित यांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेतला.

डॉ. सुप्रिया गावित, डॉ. हिना गावित आणि आम्ही कायमच वेगवेगळ्या योजना आणत असतो. लोकांना लाभ देत असतो. मात्र हे घरी झोपून राहतात. योजना कशा येतील, असा घणाघाती टोला आमदार डॉ. गावित यांनी विरोधकांना हाणला. ते म्हणाले की, आम्ही ज्या ज्या वेळी योजना आणत्या, त्या बंद पाडण्याचाच प्रयत्न विरोधकांनी केला. शेतकऱ्यांसाठी विहीर वाटप सुरू केले, विरोधकांनी तक्रार करून बंद केले.

शेतकऱ्यांना शेळी-मेंढ्या वाटप सुरू केले, तर खोटे दाखले जोडतात सांगून तक्रारी केल्या. आदिवासी बांधवांसाठी गाय वाटपाची योजना आणली. तर तीसुद्धा खोठ्या तक्रारी करून यांनी बंद पाडली. अशा लोकांना येथे वाटपाच्या ठिकाणी येऊन लाभार्थीना शिकवण्याचा अधिकार नाही, असा टोलाही डॉ. गावित यांनी विरोधकांना हाणला.

कामगार कल्याण महामंडळातर्फे कामगार बांधवांना लाभ मिळावा यासाठी मी स्वतः कामगारमंत्र्यांकडे प्रयत्न केले होते. त्या प्रयत्नांमुळे महाराष्ट्रातून फक्त चार जिल्ह्यांची निवड झाली. ज्यात नंदुरबारचा समावेश होता. त्यामुळेच निवडणुकीच्या आधी ४५ हजार गृहोपयोगी वस्तूंचे आणि सुरक्षा संचांचे वाटप करण्यात आले होते. तथापि, जे वंचित राहिले, त्यांच्यासाठी पुन्हा योजना आणीन, हा मी शब्द दिला होता.

त्यानुसार आता पुन्हा ५० हजार संच वाटपाची मान्यता मिळवली असून, २५ हजार संच वाटप झाले आहेत. २५ हजार संच पुढे वाटप केले जाणार आहेत, तरी प्रत्येक लाभार्थीस लाभ दिला जाणार आहे. नावनोंदणी करून रीतसर आणि शांततेत सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही आमदार डॉ. गावित यांनी केले.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment