---Advertisement---

तापी पाटबंधारे विभागाचा प्रताप, खोटी स्वाक्षरी करून तक्रार अर्ज निकाली

---Advertisement---

जिल्ह्याच्या दृष्टीने महतवाच्या असलेल्या तापी पाटबंधारे विभागात भोंगळ कारभार सुरु आहे . या विभागातील भ्रष्ट्राचार आणि गैरकारभार वेळोवेळी समोर आले आहे. अशात पुन्हा एकदा धक्कादायक प्रकार समोर आला आहे . त्यानुसार, तापी पाटबंधारे विभागाअंतर्गत हतनूर कालवा फुटी संदर्भात केलेल्या तक्रारदाराची खोटी स्वाक्षरी करून तक्रार अर्ज निकाली काढल्याचे समोर आले आहे. खळबळजनक अश्या या प्रकारामुळे तापी पाटबंधारे विकास महामंडळाची लक्त्तरे वेशीवर टांगली गेली आहे . या प्रकरणी चौकशी करण्यात यावी अशी मागणी तक्रारदाराने केली आहे.


नशिराबाद तालुक्यातील सामाजिक व माहिती अधिकार कार्यकर्ता नितीन सुरेश रंधे यांनी जळगावातील तापी पाटबंधारे विकास महामंडळ कार्यकारी संचालकांडे दि. २९ मे रोजी दिलेल्या तक्रार अर्जात नमूद केले आहे की, दि.११ फेब्रुवारी २०२५ रोजी हतनूर कालवा फुटी बाबत तक्रार अर्ज दिला आहे, त्या विभागाचे देखभाल दुरुस्तीचे कामाबाबत सन २०२२ ते २३ , २०२३ ते २४ आणि २०२४ ते २५ पासून सतत चौकशीसाठी मागणी करत आहे मात्र या विषयाकडे दुर्लक्ष करून आपण व आपले अधीक्षक अभियंता हे जळगाव पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्याला पाठीशी घालत आहे. व त्यात अजून भर घातली ती म्हणजे जलसंपदा विभाग दक्षता पथक अधीक्षक अभियंता ठाणे यांनी चौकशी न करता व मला प्रत्यक्ष न बोलावता ज्या अधिकाऱ्याचा या प्रकरणाशी संबंध आहे त्याच्याशी संगनमत करून माझी खोटी स्वाक्षरी करून माझा तक्रार अर्ज निकाली काढला. व चौकशी थांबविली,यावरून जळगाव पाटबंधारे विभाग कार्यकारी अभियंता व त्यांचे उपविभागीय अभियंता या चौकशी प्रकरणाशी संबंध होता आणि त्यांची चौकशी होणार असल्याने त्यांनी हे संगनमताने खोटी स्वाक्षरी करण्याचे घडवून आणले आहे. आणि याबाबत दि.२० मार्च २०२५ रोजी मी आपणाकडे लेखी अर्ज दिला आहे.

गैरप्रकाराबाबत सातत्याने मागणी करीत असल्याने चौकशीमध्ये प्रगती न झाल्याने दि.१७/७/२०२५ रोजी मी उपोषणास बसलो होतो त्यावेळेस जळगाव येथील लाभक्षेत्र विकास प्राधिकरण अधीक्षक अभियंता व प्रशासक यांनी मला उपोषणापासून परावृत्त करून धुळे पाटबंधारे विभाग धुळे कार्यकारी अभियंता यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती केली. मात्र आजपर्यंत त्यांचा चौकशी अहवाल आलेला नाही किंवा त्यांनी चौकशी केलेली नाही व मला कधीही चौकशीसाठी बोलावले नाही सतत ३ वर्षापासून पाठपुरावा करीत आहे.

त्यानंतर चौकशीसाठी लेखी पत्रव्यवहार सुरू ठेवला या प्रकरणाचा पाठपुरावा म्हणून दुसऱ्यांदा १७ मार्च २०२५ रोजी पुन्हा उपोषण सुरू केले. यावेळी उपोषण थांबवणे व मला त्यापासून परावृत्त करण्यासाठी पुन्हा प्राथमिक चौकशी अधिकारी म्हणून तापी पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक यांचे पत्रानुसार कार्यकारी अभियंता विनोद पाटील यांची नियुक्ती करण्यात आली.परंतु दि.१७ मे २०२५ पर्यंत दोन महिन्याचा कालावधील लोटला गेला परंतु चौकशी अधिकारी यांनी चौकशी केल्याचे पत्र दिले नाही किंवा चौकशीला बोलावले नाही याचा अर्थ चौकशी कागदपत्रे देखावा म्हणून पसरव्यवहार करून शासनाचा वेळ वाया घालून शासनाची दिशाभूल केली जात आहे. त्यामुळे मला आता पुन्हा लोकशाही मार्गाने पुढील कायदेशीर कार्यवाही करावी लागेल आणि त्याला संबंधित सर्व अधिकारी जबाबदार राहतील अशी दिलेल्या पत्रात नमूद करण्यात आले आहे.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment