---Advertisement---

भीषण अपघात! लग्नाचं वऱ्हाड घेऊन निघालेली स्कूल बस उलटली, दोघांचा मृत्यू

by team
---Advertisement---

तरुण भारत लाईव्ह न्यूज । ३ डिसेंबर २०२२ । लग्नाचं वऱ्हाड घेऊन निघालेल्या स्कूल बसचा भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. यात दोघांचा मृत्यू झाला असून १६ जण जखमी झाल्याची माहिती आहे. मालेगावकडून साक्रीकडे शाळेच्या बसमध्ये लग्नाचे वऱ्हाड येत असताना भडगाव बारी जवळ हा अपघात अपघात झाला.

मालेगाव तालुक्यातील चिंचवे येथील तरुणीचा विवाह साक्रीतील राजे मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आला होता. त्यासाठी मालेगाव तालुक्यातीलच एका शाळेच्या बसमध्ये मुलीकडील वऱ्हाड लग्नासाठी येण्यास निघाले. ही गाडी भडगाव बारीमध्ये आली असता बस क्र. (MH 41 AG 9805) च्या बसला भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे, तर १६ जण गंभीर जखमी झाले आहेत. यात दोघांची प्रकृती गंभीर असून त्यांना उपचारासाठी मालेगाव येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

दरम्यान या अपघाताची माहिती कळाल्याने साक्री पोलीस ठाण्याचे निरीक्षक आनंद कोकरे हे तातडीने घटनास्थळी रवाना झाले आहेत. त्याचप्रमाणे साक्री पोलीस ठाण्यात या अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

जखमी
मिराबाई बोरसे (वय ४०), मयुरी बोरसे (वय १२), निकिता सावळे (वय २५), चित्रा सावळे (वय ५५), सुवर्णा सावळे (वय ४०), रवीना समाधान सावळे (वय २१), गायत्री सावळे (वय १३), बापू सावळे (वय ६०), ललित खैरनार (वय १०), सरिता खैरनार (वय ३०), लावण्या चव्हाण (वय ९), रेखा सावळे (वय ३०), मकाबाई ह्याळीज (वय ६०) आणि कुसुम अहिरे (वय ४५) यांचा समावेश आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment