‘त्या’ हत्याकांडातील मुख्य आरोपीला अटक

तरुण भारत लाईव्ह न्यूज । ४ डिसेंबर २०२२ । बीरभूममधील बागतुई हत्याकांड आणि जाळपोळ प्रकरणातील मुख्य आरोपीला सीबीआयने अखेर अटक केली आहे. तब्बल नऊ महिन्यांच्या संघर्षानंतर सदर आरोपीला अटक करण्यात तपास यंत्रणेला यश आले आहे.
लालन शेख असे आरोपीचे नाव आहे. लालन शेख हा बागतुई हत्याकांडात मारला गेलेला तृणमूल नेता भादू शेखचा जवळचा सहकारी होता. गुप्त सूत्रांकडून माहिती मिळाल्यानंतर केंद्रीय तपास यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी रात्री उशिरा त्याला अटक केली. त्याला रविवारी रामपूरहाट उपविभाग न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. गेल्या मार्च महिन्यात घडलेल्या घटनेपासून लालन हा फरार होता.
उल्लेखनीय म्हणजे, गेल्या २१ मार्चच्या massacre in Bengal रात्री बादशाल ग्रामपंचायतीचे तृणमूल काँग्रेसचे उपाध्यक्ष भादू शेख यांची बॉम्ब फेकून हत्या केल्याची घटना समोर आली होती. भादू शेख यांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी त्या रात्री बगतुई गावातील अनेक घरांना आग लावण्यात आल्याचा आरोप आहे. घटनेनंतर दुसऱ्या दिवशी गावातून सात मृतदेह बाहेर काढण्यात आले. त्यानंतर रामपूरहाट मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये आणखी दोन जणांचा मृत्यू झाला. या घटनेबाबत सीबीआयने 21 जून रोजी आरोपपत्र दाखल केले होते. दरम्यान, मुख्य आरोपी लालन शेख हा फरार झाला. अखेर शनिवारी रात्री उशिरा सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी त्याच्यावर छापा टाकला.