नवी दिल्ली : भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गुरूवार, दि. २७ जून २०२४ संसदेच्या संयुक्त अधिवेशनाला संबोधित केले. आपल्या भाषणात त्यांनी सभागृहाला त्यांच्या सरकारच्या सर्व योजनांची माहिती दिली. केंद्र सरकारची मोफत रेशन योजना, विकसित भारत करण्याचा संकल्प, ईशान्येकडील राज्यांचा विकास यासारख्या योजनांची माहिती त्यांनी दिली, आपल्या अभिभाषणाच्या माध्यमातून देशाला दिली.
राष्ट्रपतींनी आपले भाषण हिंदीत केले. त्यानंतर उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणातील ठळक मुद्द्यांचा इंग्रजी अनुवाद संसदेत सादर केला. राष्ट्रपतीच्या अभिभाषणावेळी विरोधकांनी गोंधळ घालून व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला. पण, राष्ट्रपतींनी विरोधकांच्या गोंधळाकडे दुर्लक्ष करत आपले अभिभाषण चालू ठेवले. आपल्या भाषणात एकावेळी गोंधळ घालणाऱ्या विरोधी बाकावरील सदस्यांना शांततेत ऐकण्याची सूचना केली.
राष्ट्रपतींनी आपल्या अभिभाषणात लोकसभा निवडणुकीच्या यशस्वी आयोजनासाठी निवडणूक आयोगाचे अभिनंदन केले. त्याबरोबरच त्यांनी इंदिरा गांधींनी देशावर लादलेल्या आणीबाणीची सुद्धा आठवण केली. आणीबाणीचा काळ हा भारताच्या लोकशाही इतिहासातील काळा अध्याय होता, असं वक्तव्य राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आपल्या अभिभाषणात केले.