---Advertisement---

‘पाडळसरे’ प्रकल्पाच्या कामाला येणार गती, पीआयबीच्या बैठकीत अंतिम मान्यता, आ. अनिल पाटील यांच्या प्रयत्नांना यश

---Advertisement---

जळगाव जिल्ह्यातील सहा तालुक्यांसाठी जलसंजीवनी ठरणाऱ्या निम्न तापी प्रकल्प पाडळसरेचा केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री सिंचन योजनेत समावेश झाला आहे. गुरुवारी दिल्ली येथे जलशक्ती मंत्रालयात आयोजित गुंतवणूक बोर्डाच्या (पीआयबी) बैठकीत अंतिम मान्यता प्रदान करण्यात आली. यामुळे धरणाच्या कामाला गती मिळेल, असा विश्वास माजी मंत्री तथा आमदार अनिल पाटील यांनी व्यक्त केला.

१२ रोजी दुपारी ३ वाजता दिल्ली येथे जलशक्ती मंत्रालयातर्फे ही बैठक झाली. निम्न तापी प्रकल्प पाडळसरेचा प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत समावेश करण्यासाठी पीआयबीची मान्यता आवश्यक असल्याने नुकतीच आमदार अनिल पाटील यांनी जलशक्तत्र मंत्री सी. आर. पाटील यांची भेट घेतली होती.

त्या वेळी केंद्रीय मंत्री पाटील यांनी लवकरच गुंतवणूक बोर्ड (पीआयबी) ची मान्यता देण्याचे आश्वासन दिले होते. या बैठकीला नीती आयोग, जलशक्ती मंत्रालय, पंचायत राज, पर्यावरण, कृषी, कामगार, अर्थ यासह विविध विभागाचे सचिव उपस्थित होते. पाडळसरे धरणाचा ‘पीएमकेएसवाय’ मध्ये समावेश झाल्याने केंद्र शासन ८५९ कोटी निधी आगामी काळात या धरणाला देणार आहे.

म्हणजेच येत्या २ ते ३ वर्षातच कामाला गती येऊन केंद्र आणि राज्य शासन मिळून हे धरण पूर्ण होणार आहे, असे आमदार अनिल पाटील यांनी सांगितले. दरम्यान, निम्न तापी प्रकल्पासाठी आमदार अनिल पाटील यांनी राज्य शासनाकडून सुप्रमा मिळविल्यानंतर
केंद्राच्या योजनेत समावेश होण्यासाठी केंद्र शासनाच्या अनेक महत्त्वाच्या मान्यता आमदार अनिल पाटील यांनी प्रयत्न करून प्राप्त केल्या होत्या.

पर्यावरण विभागाची मान्यता मार्च २०२५ पर्यंत देण्यात आली होती. अखेर पीआयबीच्या मान्यतेनंतर धरणाचा प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत समावेश झाल्याने राज्यसरकारवरचा भार आता कमी होऊन अतिशय जलदगतीने धरणाचे काम पूर्ण होणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---