---Advertisement---
जळगाव : १९७५ ते १९७७ या आणीबाणीच्या कालावधीत, जिल्ह्यातील तुरुंगवासासह अनंत हालअपेष्टा भोगलेल्या लढवय्यांचा बुधवारी शासन दरबारी सन्मान होणार आहे. त्यामुळे हा दिवस या लढवय्यांच्या दाराशी आठवणींचा प्रकाश पेरणारा ठरणार आहे.
संपूर्ण जिल्ह्यात दीडशेवर सत्याग्रहींसह मिसाबंदीजन आजही स्वाभिमानाने आणि अभिमानाने समाजासाठी प्रेरणास्थान म्हणून वावरत आहेत. या लढवय्या सैनिकांची सर्वाधिक संख्या जळगाव शहरात आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागातील अनेकांनी आणीबाणीच्या काळात देशासाठी योगदान दिले आहे.
कमी वयाचा सत्याग्रही जळगावचा
विशेषतः १९७५ ते १९७७ या आणीबाणीच्या कालावधीत सत्याग्रह करण्यासाठी रस्त्यावर उतरलेला राज्यातील सर्वात कमी वयाचे सत्याग्रही हे उदय भालेराव होते. सत्याग्रहावेळी त्यांचे वय अवघे १२ वर्षांचे होते.
भाजप आज पाळणार ‘संविधान हत्या दिवस’
जळगाव : भाजपकडून २५ जून हा दिवस ‘संविधान हत्या दिवस’ म्हणून देशभरात पाळण्याचा निर्णय घेतला आहे. या दिवशी, १९७५ साली तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लागू केली होती, ज्या घटनेला २५ जून रोजी ५० वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्त जळगाव महानगर जिल्ह्याच्या वतीने या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आमदार सुरेश भोळे यांनी दिली.