तिरुपती बोर्डाचे अध्यक्ष बनवल्यानंतर वादाला तोंड फुटले; काय आहे कारण?

हैदराबाद : आमदार करुणाकर रेड्डी यांना देशातील सर्वांत श्रीमंत मंदिर असलेल्या तिरुपतीच्या बोर्डाचे अध्यक्ष बनवल्यानंतर वादाला तोंड फुटले आहे. याचे कारण म्हणजे, करुणाकर रेड्डी यांचे कुटुंब ख्रिश्चन धर्माचे पालन करते. सरकारच्या या निर्णयावर  भाजपा आणि अनेक विरोधी पक्षांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

तेदेपाचे राज्य सचिव बुची राम प्रसाद यांनी हिंदू धर्मावर विश्वास नसलेल्या व्यक्तीला मंदिराचा अध्यक्ष कसा बनवता येईल, असा सवाल केला. प्रत्येकाला माहीत आहे की, ते ख्रिश्चन धर्म मानतात. त्यांचे ख्रिश्चन लोकांशी संबंध आहेत. त्यांच्या मुलीचे लग्न ख्रिश्चन रितीरिवाजांनुसार झाले होते,

असे ते म्हणाले भाजपाच्या प्रदेशाध्यक्ष डी. पुरंदेश्वरी यांनीही या पदावर हिंदू धर्म मानणार्‍यांनीच बसावे, असे म्हटले आहे. सरकार या पदाचा वापर राजकीय फायद्यासाठी करीत असल्याचे शासनाच्या निर्णयावरून सिद्ध होते,

भाजपा नेते आणि माजी मुख्य  सचिव आय. वाय. आर. कृष्ण राव हे तिरुपती बोर्डाचे कार्यकारी अधिकारी होते, त्यांनीही सरकारच्या निर्णयावर टीका केली. ते म्हणाले की, टीटीडी विश्वस्त मंडळाच्या अध्यक्षपदाची राजकीय नियुक्ती होणे दुर्दैवी आहे. करुणाकर रेड्डी 10 ऑगस्ट रोजी तिरुमला तिरुपती देवस्थानम ट्रस्ट बोर्डाच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारतील. त्यांना हे पद सोपवण्याची ही दुसरी वेळ आहे. जगन मोहन रेड्डी यांचे वडील वाय. एस. राजशेखर रे ड्डी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री असताना करुणाकर रेड्डी यांना 2006-2008 दरम्यान ट्रस्टचे अध्यक्ष बनवण्यात आले होते.

सरकारने म्हटले, निर्णय योग्यसत्ताधारी वायएसआरसीपीने निर्णय योग्य ठरवला आहे. पक्षाचे आमदार श्रीकांत रेड्डी म्हणाले की, करुणाकर रेड्डी यांच्या धार्मिक श्रद्धांबाबत कोणताही वाद नाही. विरोधी पक्ष विनाकारण मुद्दे काढत आहेत. तिरुपतीच्या लोकांना करुणाकर रेड्डी आणि त्यांच्या धर्माबद्दल सर्व काही माहिती आहे,