सिगारेट ओढणे आणि तंबाखूचे सेवन शरीरासाठी हानिकारक असल्याचे बहुतांश लोकांना माहीत असूनही ते व्यसनाच्या विळख्यात अडकले आहे. विशेष असे की, देशात दररोज ६.५०० तरुण तंबाखू सेवना करण्यास सुरुवात करीत आहेत, तर देशात सध्या २८ कोटींहून अधिक तंबाखू तसेच तंबाखूजन्य उत्पादनांचे सेवन करणारे लोक आहेत.
यातील १८ लाख लोकांचा मृत्यू तंबाखू सेवनाच्या अतिरेकामुळे होत असल्याची धक्कादायक माहिती ग्लोबल ॲडल्ड टोबॅको अहवालातून समोर आली. यामुळे देशाचे १.८२ लाख कोटींचे आर्थिक नुकसान होत आहे, अहवालातील माहितीनुसार सिगारेट आणि तंबाखूचे सेवन करणाऱ्यांचे देशात प्रमाण सातत्याने वाढत आहे.
यामुळे भविष्यात गंभीर संकटाला तोंड द्यावे लागू शकते. राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमानुसार दरवर्षी सुमारे १८.३ लाख लोकांचा मृत्यू तंबाखूजन्य विविध आजारांमुळे होत असतानाही देशात दररोज ६,५०० तरुण तंबाखूचे सेवन करण्यास सुरुवात करतात. या वेगामुळे दरवर्षाला तंबाखू सेवन करणान्यांमध्ये २४ लाख जणांची भर पडत असते.
तंबाखूजन्य आजारांविरोधात सुरू असलेल्या जनजागृती मोहिमेला देशात तुलनेत फारच कमी यश मिळताना दिसत आहे. सध्या ज्या गतीने तंबाखू वापरावर नियंत्रण आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यानुसार तंबाखू संपूर्णपणे सोडायला १५२ वर्षे लागतील. तोंडाचा कर्करोग, फुप्फुसे, हृदयविकार, स्ट्रोक, श्वसन आजार आदी आजारांसाठी तंबाखू हे प्रमुख कारण आहे.
तंबाखू सेवनामुळे होतात हे आजार
- कर्करोग : तंबाखूच्या सेवनामुळे फुफ्फुस, घसा, मुख, अन्ननलिका आणि मूत्रपिंड आदी अवयवांना कर्करोग होण्याची शक्यता वाढते.
- हृदयविकार: तंबाखूचे सेवन केल्याने उच्च रक्तदाब, हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक आणि इतर हृदयविकार होण्याची शक्यता वाढते.
- फुफ्फुसाचे आजार : तंबाखूच्या सेवनामुळे क्रॉनिक ब्रॉन्कायटिस, एम्फिसीमा, आणि इतर फुफ्फुसाचे आजार होण्याची शक्यता.
- इतर आजार : तंबाखूच्या सेवनामुळे मधुमेह, अस्थिरोग, डोळे कमजोर होणे, आणि लैंगिक क्षमता कमी होणे पासारखे अनेक आजार होण्याची शक्यता आहे.
सरकारला महसुलापेक्षा नुकसान अधिक
देशात २८ कोटींहून अधिक तंबाखू तसेच तंबाखूजन्य उत्पादनांचे सेवन करणारे लोक आहेत, अशी माहिती अहवालातून पुढे आली. १.८२ लाख कोटींचे आर्थिक नुकसान देशाला दरवर्षी तंबाखूच्या सेवनामुळे होते. हे जीडीपीच्या १ टक्क्यापेक्षा अधिक आहे. तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीतून सरकारला मिळणाऱ्या महसुलापेक्षा हे नुकसान अधिक आहे.
- संयुक्त राष्ट्र संघाच्या ध्येयांनुसार २०३० पर्यंत अकाली मृत्यू कमी करापचे असतील, तर तंबाखू सोडणे अत्यावश्यक आहे. तंबाखू, सोडण्यासाठी १८००-११-२३५६ ही हेत्पलाइन सुरु करण्यात आली आहे. लवकरच ‘आम्ही तपार आहोत’ ही राष्ट्रीय मोहीम सुरू केली जाईल.
डॉ. रामनाथ मिश्रा संचालक, राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम